मुंबई (वृत्तसंस्था) राज्यपाल आणि ठाकरे सरकर हा वाद पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे. कारण आता राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरुंची नियुक्ती आता थेट राज्यपाल करू शकणार नाहीत. राज्य सरकारच्या शिफारशीनुसारच कुलगुरु नियुक्त केले जाणार आहेत. यासंदर्भातील कायद्यात बदल करण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी दिली आहे.
मंत्रीमंडळाच्या बैठकीतील निर्णयानुसार राज्यातील कुलगुरूंची नियुक्ती थेट राज्यपालांना करता येणार नाही. राज्य सरकारच्या शिफारशीनुसारच कुलगुरु नियुक्त केले जाणार आहेत. यासाठी कायद्यात बदल करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. दरम्यान, कुलगुरूंच्या नियुक्त्यांसाठी प्र-कुलपती हे नवं पद निर्माण केलं जाणार आहे. तसेच राज्यातील विद्यापीठांच्या प्र-कुलपतीपदाचे अधिकार राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांकडे असतील.