भुसावळ (प्रतिनिधी) तालुक्यातील तळवेल येथील ४३ वर्षीय व्यक्तीचा शेतात विजेचा धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि. १०) रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली.
तळवेल येथील नीलेश उर्फ सोपान गोपाळ पाटील (वय ४३) हे शेतात काम करत होते. शेतातील वीज पंप सुरु करतांना त्यांना विजेचा जबर धक्का बसल्याने ते बेशुद्ध झाले. त्यानंतर त्यांना तत्काळ भुसावळ येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु, तेथे डॉक्टरांनी तपासणी करुन त्यांना मृत घोषित केले.
याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात शून्य क्रमाकांने फिर्याद दाखल केली होती. त्यानंतर वरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत सोपान पाटील यांच्यावर तळवेल येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.