धरणगाव (प्रतिनिधी) सर्वत्र विवाह समारंभ सुरू असून प्रत्येक जण लगबगीने आपले कार्य पार पाडण्यासाठी उत्सुक असतो. परंतु पाळधी गावात आज अनोखा विवाह समारंभ पार पडला. दि 11 एप्रिल रोजी पाळधी येथे सेवानिवृत्त जवान आयु. गुलाब साळवे (मूळ रहिवासी वंजारी बु ता धरणगाव) यांच्या चिरंजीव सागरचा विवाह जगन निकम निंभोरा ता सोयगाव यांच्या गायत्री मुलीशी बोद्ध परंपरेने संपन्न झाला.
11 एप्रिलला महात्मा फुले यांची जयंती असल्याने आलेल्या मान्यवरांना तब्बल 500 पुस्तक देत साळवे परिवारने आदर्श घालून देत उपस्थित लोकांना वैचारिक चळवळ साठी प्रेरित केले. या उपक्रमाने सर्वत्र कौतुक होत असून चळवळ मजबूत कारण्यासाठी या प्रकारे प्रबोधन विचार आदान प्रदान केले पाहिजेत असे सूर उमटत होते. विवाह प्रसंगी पाणीपुरवठा मंत्री भाऊसो गुलाबराव पाटील, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, माजी सैनिक बांधव, विविध सामाजिक पदाधिकारी आदी सर्व उपस्थित होते.