मनमाड (वृत्तसंस्था) पतीचे अनैतिक संबंधाबाबत विचारणा केली म्हणून पत्नीस मारहाण करून शाररीक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सासू, सासरे आणि दिराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पिडीत विवाहितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पती बाबासाहेब भालचंद्र बोरसे यांचे इतर स्त्री सोबत असलेले अनैतिक संबंधाबाबत विचारपुस केल्यावर त्यांनी मारहाण करून शाररीक छळ करणे तसेच मानसिक त्रास देणे असे प्रकार सुरु केले होते. याच दरम्यान लग्नामध्ये माहेरच्या लोंकानी घेतलेले ९ तोळयाचे सोन्याचे दागिणे आर्थिक फायदया करिता पती बाबासाहेब बोरसे, सासरे भालचंद्र बोरसे, सासु अंजना बोरसे व दिर अनिल बोरसे यांनी आपसात संगणमत करुन हडप केले. याबाबत वारंवार विचारणा केली असता मारहाण करणे, शाररीक छळ करणे, आर्थिक कोंडी करणे तसेच मानसिक छळ देणे व घरातुन बाहेर काढुन टाकणे असे प्रकार रोजच्या रोज करत होते, असेही पिडीत विवाहितेने फिर्यादीत म्हटले आहे. या सर्व त्रासास कंटाळून आपण नाईलाजस्तव राष्ट्रीय महिला आयोग, भारत सरकार यांच्याकडे तक्रारी अर्ज केला होता. त्या तक्रारी अर्जावर कारवाई करत मनमाड पोलीस ठाणे येथे गुरनं २०७/२०२३ भादवि कलम ४९८- अ,४०६,३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.