धरणगाव (प्रतिनिधी) येथील नगर परीषद प्रशासनाकडून केंद्र शासनाच्या निर्देशानुसार शहरात पथविक्रेता समिती गठित करण्याच्या दृष्टीने पाऊलं टाकली आहेत. त्यानुसार शहरात पथविक्रेता सर्वेक्षण करण्यात येत आहे. आतापर्यंत शहरात ३३४ पथविक्रेत्यांची नोंदणी करण्यात आली आहे. यामध्ये शहरातील सर्व प्रमुख चौकातील सर्वेक्षण करण्यात आले असून जे कोणी या सर्वेक्षणातून राहुन गेले असतील, त्यांनी नगर पालिकेशी संपर्क करुन ३० सप्टेंबर पर्यंत सर्वेक्षण करुन घ्यावे.
नगर परीषदेकडुन अधिकृत पथविक्रेत्यांची नोदणी केल्यानंतर शहरातील सर्व पथविक्रेत्यांची यादी कामगार आयुक्तांकडे पाठविण्यात येणार आहे. ३० सप्टे पर्यंत नोंदणी प्रक्रियेत ज्या फेरीवाल्यांची नोंद होईल तेच फेरीवाले अधिकृत फेरीवाले म्हणुन ग्राह्य धरण्यात येणार आहे. नंतर आलेल्या पथविक्रेत्यांचा सर्वेक्षण केले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
पथविक्रेत्यांची नोंदणी जिओ टॅगिंग च्या माध्यमातुन करण्यात येत असुन या साठी फेरीवाल्यांकडे आधार कार्ड सह लिंक केलेला मोबाईल नंबर असने गरजेचे आहे. नगर परीषदेने जरी ३३४ पथविक्रेत्यांचे सर्वेक्षण केले असले तरी अद्याप काही फेरीवाल्यांनी आपली कागदपत्रे नगरपरीषदेकडे जमा केलेली नाहीत. त्यामुळे नोंदणी झाल्यानंतर तात्काळ कागदपत्रं नगर परीषदेकडे जमा करावीत असे आवाहन धरणगाव नगर परीषदेचे मुख्याधिकारी जनार्दन पवार यांनी केले आहे.