औरंगाबाद (वृत्तसंस्था) प्रेमविवाह करणाऱ्या बहिणीची भावाने अमानुष हत्या केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमधील वैजापूर तालुक्यात घडली आहे. ऑनर किलिंगच्या या घटनेने पुन्हा एकदा महाराष्ट्र हादरून निघाला आहे. या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
वैजापूर तालुक्यातील लाडगाव शिवरात राहणाऱ्या तरुणाने बहिणीने प्रेम विवाह केला म्हणून कोयत्याने वार करत बहिणीची मुंडक छाटून हत्या केल्याचा अमानुष प्रकार घडला आहे. बहीण आणि तिचा प्रियकर विवाह करून आले होते. बहिणीने प्रेम विवाह केल्याचा राग आरोपीनं मनात ठेवला होता. त्याच रागाच्या भरातून भावाने धारदार कोयत्याने मुंडक धडावेगळ करत बहिणीची हत्या केली आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच वैजापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे हत्या करणाऱ्या भाऊ अल्पवयीन असल्याचे कळतंय. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.