जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, दि. ११ रोजी कमाल तापमान ४४.३ अंश सेल्सिअसची नोंद करण्यात आली. हे तापमान सरासरीपेक्षा १.७ अंशांनी अधिक असल्याने नागरिकांना तीव्र उकाड्याचा सामना करावा लागत आहे. किमान तापमान २६.५ अंश सेल्सिअस राहिले. दरम्यान, हवामान विभागाने तीन दिवस जिल्ह्यात ‘हीट वेव्ह’ अर्थात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.
सोमवार ते बुधवार दरम्यान तापमान ४५ ते ४६ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः दि. १२ व १३ मे रोजी ४६ अंशांपर्यंत तापमान पोहोचण्याचा अंदाज असून नागरिकांनी दुपारच्या वेळेत घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यातआले आहे. जळगाव शहरासह जिल्ह्यातील भुसावळ येथेही उच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली.
शहरात आजपर्यंतह रात सायकाळा सहा झळा जाणवत होत्या. त्यामुळे शहरात दिवसभर बाजारपेठा ठप्प असतात. सायंकाळी नागरिक बाजारात गर्दी करताना दिसत आहेत.
वाढत्या तापमानामुळे दुपारच्या वेळेत रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत असून शेतकरी, मजूर व प्रवाशांना उष्माघाताचा धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने नागरिकांना असे होते आठवठाभर तापमान
४मे
४३.१ अंश
५मे
४३.१ अंश
६ मे
४३.१ अंश
७ मे
८मे
४२.६ अंश
९ मे
४२.६ अंश
१० मे
४२.६ अंश
४४.५ अंश
भरपूर पाणी पिणे, थेट उन्हात जाणे टाळणे व आवश्यक असल्यासच बाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे.
रविवारी ढगाळ वातावरण
जिल्ह्यात आठवड्यात उंच्चाकी तापमान राहणार असून, १७ मे रोजी अंशतः ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे तापमाचा पाराही ४१ अंशापर्यंत घसरण्याचा अंदाज असल्यामुळे उन्हांची तीव्रता कमी होणार असल्यामुळे उन्हांपासून दिलासा मिळणार आहे.
















