अमरावती (वृत्तसंस्था) अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर खालच्या भाषेत टीका केली आहे. मुख्यमंत्री वारंवार सांगूनही ऐकत नसेल तर मातोश्रीसमोर जाऊन बेशरमाचं झाड लावणार असल्याचं रवी राणांनी जाहीर केलंय. काल एका फेसबुक लाईव्ह मध्ये बोलत असताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरच आक्षेपार्ह विधान केलं आहे.
आमदार रवी राणा फेसबुक लाईव्हद्वारे बोलत असताना एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना कशाप्रकारे संघर्ष करावा लागतो हे सांगत होते. त्या वेळी रवी राणा यांनी एमपीएससीचा विद्यार्थी स्वप्निल लोणकर यांच्या आत्महत्याचे मुद्दा उपस्थित केला. राज्य सरकारने स्वप्निल लोणकर याच्या कुटुंबीयांना तात्काळ एक कोटी रुपयांची मदत करावी, अशी मागणी यावेळी राणा यांनी केली.
फेसबुक लाईव्हद्वारे राणा पुढे म्हणाले, गोरगरीब जनता शेतकरी व युवकांचे प्रश्न विचारणार्या बारा आमदारांना निलंबित करण्यात आले. स्वप्निल लोणकर या युवकाने फक्त एमपीएससी परीक्षा घेऊन सुद्धा मुलाखतीला न बोलावल्यामुळे आत्महत्या केली. या सरकारने लॉकडाऊनमध्ये केलेला भ्रष्टाचार, शेतकऱ्यांचे प्रश्न एमपीसीच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न निकाली काढले नाही तर मातोश्री समोर जाऊन बेशरमचे झाड लावणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेसमोर संदेश जाईल आम्ही कितीही ओरडून ज्या माणसाला कळतच नाही, असा बे… मुख्यमंत्री मी आयुष्यात पहायला नाही. बेशरमचे झाड लावल्या मुळे त्यांना काहीना काही फरक पडेल व ते राज्यातील जनतेला दिलासा देतील, असे आक्षेपार्ह विधान आमदार रवी राणा यांनी केले आहे.