धरणगाव (प्रतिनिधी) मतदानाच्या संदर्भात नागरिकांमध्ये फारशी जागरूकता दिसून येत नाही मतदानाच्या संदर्भात नागरिक उदासीन दिसून येतात लोकशाहीने प्रत्येकाला दिलेल्या मतदानाचा हक्क प्रत्येक नागरिकांनी बजावला पाहिजे यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या कुटुंबातील मतदारांना (पालकांना) मतदान करण्याचा आग्रह करावा असे आवाहन तालुक्याचे तहसिलदार महेंद्र सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना केले. येथील पी.आर.हायस्कूल मध्ये आयोजित मतदान जनजागृती कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक डॉ. संजीव कुमार सोनवणे हे होते तर मंचावर पर्यवेक्षक कैलास वाघ, उमाकांत बोरसे, डॉ.बापू शिरसाठ, एनसीसी अधिकारी डी. एस. पाटील हे उपस्थित होते.
यावेळी तहसीलदार सूर्यवंशी यांना विद्यार्थ्यांना मतदानाचे महत्त्व मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी आपल्या आई, वडील, भाऊ,बहीण अन्य नातेवाईक अथवा ओळखीच्या मतदारांना मतदान करण्यासंदर्भात जागृती निर्माण करावी व मतदान यंत्रणेची माहिती पालकांना द्यावी असे आवाहन केले. तसेच तहसील कार्यालयामार्फत विद्यार्थ्यांसाठी असलेल्या सुविधा उत्पन्नाच्या दाखला जात प्रमाणपत्र रहिवासी दाखला अधिवास दाखला आदी संदर्भात माहिती देऊन येणाऱ्या काळात विविध दाखल्यांसाठी शाळेतच शिबिर आयोजित करण्याचे आश्वासित केले. यावेळी तहसीलदार सूर्यवंशी यांच्या हस्ते टिळक महाराष्ट्र विद्यापीठ मार्फत घेण्यात आलेल्या विविध परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले या परीक्षांचे आयोजन शिक्षक गणेशसिंह सूर्यवंशी हे करतात. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक डॉ. संजीव कुमार सोनवणे यांनी तर सूत्रसंचालन आभार डी एस पाटील यांनी व्यक्त केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी व्ही एच चौधरी ,ज्ञानेश्वर कोळी ,गोपाल चौधरी यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर वृंदानी परिश्रम घेतले.