धरणगाव (प्रतिनिधी) धानोरे येथील शेतकरी भगवान पंडित महाजन (वय ३०) यांनी आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास शेतात गेले असता अवकाळी पावसाने झालेले पिकाचे नुकसान पाहून विष प्राशन करून आत्महत्या केली.
या शेतकऱ्यावर विकास सोसायटीचे तीन लाख पन्नास हजार आणि फायनान्स कंपनीचे दोन लाख रुपये कर्ज होते. शेतातले पिकाचे नुकसान पाहून कर्ज कसे फेडावे या विचाराने शेतकऱ्याने आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात एक मुलगा दोन मुली असा परिवार आहे.