मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्रमध्ये राष्ट्पती शासन लावण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाकडून फेटाळण्यात आली आहे. तसेच आपण राष्ट्रपतींकडे जाऊ शकता अशा शब्दात सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या याचिकाकर्त्याला उत्तर दिले आहे.
विक्रम गेहलोत यांनी ठाकरे सरकार हटवून राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर तुम्हाला महाराष्ट्र किती मोठे राज्य आहे, हे माहित आहे का?, असे विचारात सर्वोच्च न्यायालयाने याचिकार्ते गेहलोत यांना खडेबोल सुनावले. सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी सरकार संविधानच्या आधारवर काम करत नाही असा आरोप याचिकर्ते गेहलोत यांनी केला होता. पण मुंबईत अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूची घटना घडली. त्यावरून संपूर्ण राज्यात राष्ट्रपती शासन लागू करणे योग्य नसल्याचे सरन्यायाधीश म्हणाले.