धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव तालुका संजय निराधार समितीची बैठक त्वरित लावावी, अशी मागणी एका निवेदनाद्वारे शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी केली आहे. त्यांनी याबाबतचे निवेदनही नुकतेच दिले.
धरणगाव तालुका संजय निराधार समितीची बैठक 8 फेब्रुवारी २२ रोजी घेण्यात आली असून आतापर्यंत सात ते आठ महिने झाले, तरी संजय निराधाराची मिटींग झाली नाही. तालुक्यातील तिन्ही योजना मिळून 1100 ते 1200 प्रकरणे जमा झाले आहेत. तहसीलदार यांना दोन तीन वेळा गुलाबराव वाघ शिवसेना सहसंपर्क प्रमुख यांनी चर्चा करतांना देखिल याबाबत सांगितले होते. तालुक्यातील 1100 ते 1200 प्रकरणे छाननी /चौकशी होऊन कार्यालयात जमा झालेले आहे, हे लाभार्थी मिटींग न झाल्याने लाभापासून वंचित आहेत. त्यामुळे गोरगरीब /अपंग /विधवा यांच्यामध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. तरी तहसीलदार साहेबांनी ताबडतोब मिटींग काढण्याचे संबंधितांना आदेश द्यावेत अशा आशयाचे निवेदन आज देण्यात आले.
याप्रसंगी गुलाबराव वाघ शिवसेना सहसंपर्कप्रमुख, रवींद्र जाधव उपशहरप्रमुख, कमलेश बोरसे, धिरेंद पुरभे, विलास पवार, प्रल्हाद तायडे, भास्कर बत्तीसे गोपाल पाटील, बापू चावदस माळी, राहुल रोकडे, ज्ञानेश्वर पांडुरंग माळी, अमोल चौधरी आदी उपस्थित होते.