TheClearNews.Com
Sunday, June 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘…तर भाजप तीव्र आंदोलन करेल’ ; अँड. संजय महाजनांचा इशारा

The Clear News Desk by The Clear News Desk
March 4, 2022
in धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) महाविकास आघाडी सरकारने २ वर्ष ऐम्पेरीकल डाटा गोळा करण्याचे टाळल्यामुळे ओबीसी समाजाचे आज पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्था मधील निवडणुकीतील आरक्षण गेले. मा.सर्वोच्च न्यायालयाच्या काल गुरवारच्या निर्णयानंतर महाविकास आघाडी सरकार कडे कोणतीही सबब उरलेली नसून या सरकारने एमेरिअल डेटा गोळा करण्यात अजुनही टाळाटाळ केली तर भारतीय जनता पार्टी तीव्र आंदोलन करेल असा इशारा भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संजय महाजन यांनी दिला आहे.

संजय महाजन यांनी महाविकास आघाडी सरकारच्या बेपर्वाईमुळे व ओबीसी विरोधी भूमिकेमुळे आताच झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समित्या व नगरपंचायतीच्या निवडणुकीत ओबीसीचे आरक्षण गेले आहे. आगामी महानगरपालिका जिल्हा परिषदा आणि नगरपालिकांच्या निवडणुकातही महाविकास आघाडीमुळे ओबीसींना राजकीय आरक्षणाला मुकावे लगाणार आहे. हे भाजपा सहन करणार नाही असा इशारा दिला आहे.

READ ALSO

धरणगावातील स्वामी समर्थ केंद्रातून मुकुटासह दान पेटीतील रक्कम चोरट्यांनी लांबवली

जिल्ह्यातील केळी उत्पादकांना तत्काळ मदत देण्याचे कृषीमंत्र्यांचे निर्देश

संजय महाजन पुढे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने १३ डिसेंबर २०१९ च्या आदेशा नुसार महाविकास आघाडी सरकारला ओबीसी च्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण टिकविन्याकरिता ट्रिपल टेस्ट पूर्ण करण्यास सांगितले होते. ओबीसींची त्या त्या स्थानिक स्वराजःसंस्थेच्या क्षेत्रातील नेमकी ओबीसीची संख्या किती आणि त्यांचे राजकीय प्रतिनिधित्व कीती तसेच ओबीसी सामाजामधील राजकीय मागासलेपणा किती याची आकडेवारी म्हणजेच एम्पिरिकल डेटा गोळा करणे होय. आणि हा या टेस्टमधील अत्यंत महत्वाचा भाग आहे, हे केल्याशिवाय ओबीसींना पुन्हा राजकीय आरक्षण मीळू शकत नाही ही बाब विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार सांगितली. पण महाविकास आघाडी सरकारला आज पर्यंत राज्य मागासवर्ग आयोगामार्फत एम्पिरिकल डेटा गोळा करता आला नाही, हे सरकार एम्पेरिकल डेटा गोळा करणे टाळत असल्याचे आता सिद्ध झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निर्णय नंतर महाविकास आघाडी सरकारला कोणतीही सबब उरलेली नसून आतातरी या सरकारने पूर्ण शक्तीनिशी एम्पिरिकल डेटा गोळा करून ओबीसीचे आरक्षण पुन्हा प्रस्थापित केले पाहिजे. या सरकारने असाच वेळ काढू पणा चालू ठेवला तर भाजपा तीव्र आंदोलन करेल.

महाविकास आघाडी सरकारने चुकीचा अध्यादेश काढल्यामुळे ओबीसींना भंडारा, गोंदिया या दोन जिल्हा परिषदा आणि १०६ नगरपंचायतीमध्ये आरक्षणाला मुकावे लागले आहे. ओबीसींना आरक्षण मिळू नये हा या सरकारमधील काही प्रभावी नेत्यांचा डाव यशस्वी झाला असला तरी ओबीसी समाजाचे यामुळे फार नुकसान झाले आहे. भाजपा याचा निषेध करते, आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेमध्ये ओबीसींना आरक्षण मिळू नये असा या सरकारचा प्रयत्न असला तरी भाजपा तो हाणून पाडेल. राज्य मागासवर्ग आयोगाने सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या अहवाला नुसार ओबीसींची संख्या ३८% टक्केच दाखवली आहे ही संख्या राज्य सरकारने कुठून जमा केली हे एक रहस्य आहे. कारण की स्वातंत्र्यानंतर संविधानानुसार ओबीसींची संख्या 52 टक्के च्या वर असल्याचे दाखविन्यात आले होते. त्याच्यानंतर अनेक छोटे समाजाची संख्या त्यात अंतर्भूत झाल्यानंतर ओबीसींची संख्या ही वाढलेली आहे हे सर्व आकडेवारी डोळ्यासमोर असतानासुद्धा राज्य मागासवर्गीय आयोगाने सुप्रीम कोर्टात आपली बाजू भक्कमपणे मांडली नाही त्यामुळे मा.सर्वोच्च न्यायालयानी त्यांनी दिलेला अंतरिम अहवालावर समाधान झाले नाही व म्हणूनच सुप्रीम कोर्टाने राज्य मागासवर्गीय आयोगाचा अंतरिम अहवाल हा फेटाळला व पुढील आदेशापर्यंत ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळणार नाही असे सिद्ध झाले.

त्या सर्व घटना बघता राज्य सरकारने मुद्दामच सुप्रीम कोर्टात ओबीसी आरक्षणाबाबत आकडेवारी चुकीची मांडली असा निष्कर्ष निघतो व ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण द्यायचेच नाही असा राज्य सरकारचा हेतू दिसतो. परंतु ओबीसी समाज राज्य सरकारचा हा डाव हाणून पाडेल व भारतीय जनता पार्टी व भाजपा ओबीसी मोर्चा ओबीसीला आरक्षण दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. असे न झाल्यास भाजपा सर्व शक्तीनिशी रस्त्यावर उतरून महा विकास आघाडी सरकारच्या विरोधात हल्लाबोल करेल असा इशारा भारतीय जनता पार्टी व ओबीसी मोर्चाने दिला आहे. भविष्यात निवडणुकीत ओबीसी समाज राज्य सरकारला त्यांची जागा दाखवून देईल, असेही अँड. महाजन यांनी म्हटले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

धरणगावातील स्वामी समर्थ केंद्रातून मुकुटासह दान पेटीतील रक्कम चोरट्यांनी लांबवली

June 18, 2026
कृषी

जिल्ह्यातील केळी उत्पादकांना तत्काळ मदत देण्याचे कृषीमंत्र्यांचे निर्देश

June 11, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
गुन्हे

धरणगाव तालुक्यात बालिकेचा विनयभंग; संशयिताला अटक

June 3, 2026
धरणगाव

धरणगावात मोफत मोतीबिंदू शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…!

May 29, 2026
Next Post

व्हिडीओ पाहून अनैसर्गिक सेक्ससाठी जबरदस्ती ; गर्भवती पत्नीसोबत करत होता क्रूर कृत्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कांद्याचे भाव घसरले, ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी !

November 4, 2020

वार्ता फाउंडेशन पत्रकार संघटनेची नूतन कार्यकारिणी बिनविरोध निवड

January 11, 2021

अमळनेरचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्याकडे जळगाव एमआयडीसीचा पदभार !

December 1, 2022

भाजप आमदार संजय कुटे दारु पिऊन कुठेही पडतात : शिवसेना आमदार संजय गायकवाड

April 19, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group