जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यातील ९ तालुके निरंक आहेत. तर आज अवघे ३४ नवीन रूग्ण पॉझिटीव्ह आढळून असून जिल्ह्यातून आज १०४ रूग्ण कोरोनामुक्त झालेत. सुदैवाने आज एकही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.
जळगाव शहर – ०२, जळगाव ग्रामीण- ०५, भुसावळ- १४, अमळनेर-०१, चोपडा-००, पाचोरा-००, भडगाव-००, धरणगाव-००, यावल-००, एरंडोल-००, जामनेर-००, रावेर-०२, पारोळा-००, चाळीसगाव-००, मुक्ताईनगर-०८, बोदवड-००, इतर जिल्ह्यातील-०० असे एकुण ३४ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची संख्या एकुण ५३ हजार २६५ पर्यंत पोहचली असून ५१ हजार २७६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. आज दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत १२६९ रुग्णांचा मृत्यू झाला आहेत. तर ७२० रुग्ण सध्या उपचार घेताय.