छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) पंजाबातील फिरोजपूर येथील गुरुद्वाराजवळ चार दिवसांपूर्वी अंदाधुंद गोळीबार करत तब्बल ५० राऊंड फायर करून बहिणीसह दोन भावांची निघृण हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली होती. यातील सहा आरोपींना शनिवारी (दि. ७) पहाटे ५ वाजता छत्रपती संभाजीनगरजवळ समृद्धी महामार्गावरील कोलठाणवाडी बोगद्यात पोलिसांनी एके-४७ रायफल रोखून जेरबंद केले.
अक्षयकुमार ऊर्फ बच्छा बलबीरसिंग (२१), दिलेरसिंग मनिंदर चिवनसिंग (२२), सुखचैनसिंग गब्बरसिंग जास (२०), रवींद्रसिंग कर्नेलसिंग सुख (२१, सर्व रा. भानसी गेटजवळ, खालसा कॉलनी, फिरोजपूर), गुरुप्रीत दर्शनसिंग गोपी (२५, रा. पिंडचोला साहिब, जि. तरणतारण), प्रिन्स काका संधू (१८, रा. कुंडेपिंड हुसेनीवाला, बॉर्डर रोड, फिरोजपूर, सर्व रा. पंजाब) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. फिरोजपूर शहरातील गुरुद्वाराजवळ ३ सप्टेंबर रोजी एका कारवर ९ जणांनी दिवसाढवळ्या बेधुंद गोळीबार केला होता. यात दिलीपसिंग (३२) आणि आकाशदीप सिंग हे जसप्रीत कौर (२२) हे भाऊ-बहीण जागीच ठार झाले होते. यातील मृत जसप्रीत कौरचे लग्न अवघ्या दहा दिवसांवर आले होते. घरात लग्नाची तयारी सुरू होती व नवरी मुलगी भावंडांसह खरेदीसाठी घराबाहेर पडली होती. आरोपींनी त्यांची कार वाटेतच अडवून या तिघांवर बेछूट गोळ्यांचा अक्षरशः पाऊस पाडला. मृतांच्या अंगावर आरोपींनी झाडलेल्या जवळपास ५० गोळयांच्या खुणा आढळल्या होत्या.
या थरारक घटनेनंतर आरोपी पंजाबमधून फरार झाले होते. हे शस्त्रसज्ज आरोपी ठिकाण बदलत नदिडमध्ये दाखल झाले होते. दरम्यान, पंजाब पोलीस दलाचे अप्पर पोलीस महासंचालक प्रमोद बान व अॅन्टी गैंगस्टर टास्क फोर्सच्या प्रमुखांना खुनातील आरोपी महाराष्ट्रात आल्याची माहिती मिळाली. शनिवारी पहाटे २.३० वाजेच्या सुमारास प्रमोद बान यांनी छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांना ही माहिती दिली. त्याआधारे त्यांनी माहिती घेत असता वरील प्रकरणातील सहा आरोपी नदिडहून भाड्याची इनोव्हा कार (एमएच २६ एसी ५५९९) घेऊन समृद्धी महामागनि मुंबईच्या दिशेने जात असल्याचे व तासाभरात ते छत्रपती संभाजीनगर येथे येणार असल्याची माहिती मिळाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप गुरमे यांना माहिती देऊन जलद प्रतिसाद पथकासह गुन्हे शाखेची टीम समृद्धी महामार्गाकडे रवाना केली.
बोगद्यात असे राबवले ऑपरेशन
ऑपरेशनमध्ये निरीक्षक संदीप गुरमे यांनी अत्यंत धाडसी योजना आखली. त्यांनी जलद प्रतिसाद पथकासह १० अधिकारी, ४० पोलीस कर्मचारी यांना ऑपरेशनची माहिती दिली. बुलेटप्रूफ जॅकेट, अत्याधुनिक शस्त्र घेऊन पोलीस पथक समृद्धी महामार्गावरील कोलठाणवाडी बोगद्याच्या दिशेने रवाना झाले. पहाटे पाच वाजेच्या सुमारास बोगद्याजवळ सापळा रचून थांबलेले होते. याचवेळी आरोपी कारमध्ये एका पंपावर डिझेल भरून समृद्धी महामार्गावरून पुन्हा मुंबईकडे निघाले. हीच संधी साधत पोलिसांनी समोरील बोगद्यात त्यांना अपघाताचा बनाव करत दोन्ही बाजूंनी वाहने आडवी लावली. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक मंद झाली. या चक्रव्यूहात आरोपींची गाडी हेरून तिला अधिकाऱ्यांनी घेराव घातला. त्यानंतर पोलिसांनी त्यांना कारमधून बाहेर येण्याच्या सूचना दिल्या. मात्र, आरोपींनी येण्यास नकार दिला. आरोपी शस्त्रसज्ज असल्याने पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेत एके-४७ रायफलने कारच्या काचा फोडत आरोपींवर पिस्तूल रोखल्या. त्यामुळे आरोपींना प्रतिकाराची कुठलीही संधी मिळाली नाही व पोलीस पथकाने सहा जणांच्या मुसक्या आवळत ऑपरेशन यशस्वी केले.