TheClearNews.Com
Saturday, June 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ओला दुष्काळ जाहिर करून शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत द्यावी ; रोहिणीताई खडसे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी !

vijay waghmare by vijay waghmare
September 27, 2024
in कृषी, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) मुक्ताईनगर बोदवड रावेर तालुक्यात सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण होते परंतु सतत पडत असणाऱ्या संततधार पावसाने या तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असुन सततच्या पावसाने यंदाच्या खरीप हंगामाचे मोठे नुकसान झाले आहे.

प्रामुख्याने मका सोयाबीन उडीद मुग या पिकाला मोठा तडाखा बसला.आहे
तर कपाशीच्या कैऱ्या सडायला लागल्या असुन कपाशीवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे यामुळे शेतकरी बांधवांचे अतोनात नुकसान झाले असुन ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना भरीव स्वरूपात सरसकट आर्थिक मदत करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.

READ ALSO

घरकाम करणाऱ्या महिलेसह साथीदाराला अटक; ४ लाखाचा मुद्देमाल हस्तगत

मुक्ताईनगर तालुक्यात पोलिसांचे ‘ऑपरेशन ड्रॉपकेस’

यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शेतकरी बांधवानी जुन जुलै महिन्यात खरिपाची पेरणी केल्यानंतर सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने पिक चांगले बहरल्याने शेतकरी बांधवां मध्ये आनंदाचे वातावरण होते त्यामुळे शेतकरी बांधवानी पिकांना मुबलक प्रमाणात रासायनिक खते, कीटकनाशके फवारणी केली. परंतु
जुलै महिन्यापासून सतत कोसळत असलेल्या संततधार पावसाने मुक्ताईनगर, बोदवड, रावेर तालुक्यात ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. सततच्या पावसामुळे शेतातील पाण्याचा निचरा न झाल्यामुळे शेतात पाणी तुंबले आहे त्यामुळे कपाशी पिकांवर बोंडअळी, मर, लाल्या इ. रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे तसेच सततच्या पावसामुळे कपाशीला असलेल्या कैऱ्या काळ्या पडून सडायला लागल्या आहेत. काही ठिकाणी कापसाची फुटलेली बोंडे खराब झाली आहेत यामुळे कापुस पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. तसेच काढणीला आलेले सोयाबिन, मका, उडीद, मुग, भुईमूग या पिकांचे अतोनात नुकसान होऊन जमीनदोस्त झालेले आहेत.
सोयाबिन, मका यांना कोंब फुटले आहेत. काही मंडळात गेल्या दोन दिवसात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे कापून टाकलेला मका,सोयाबिन वाहून गेले आहे. सुरवातीला पिकांची स्थिती उत्तम असल्याने शेतकरी बांधवानी पिकांवर आतापर्यंत लाखो रुपये खर्च केला आहे परंतु ओल्या दुष्काळाच्या अस्मानी संकटामुळे शेतकरी बांधवांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. त्यामुळे शेतकरी बांधव हवालदिल झाले आहेत, अशा परिस्थितीत सरकारने अन्नदात्या शेतकरी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे गरजेचे आहे.

शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून तत्काळ शेतकरी बांधवांना सरसकट हेक्टरी भरीव स्वरूपात आर्थिक मदत करून शेतकरी बांधवांना आर्थिक गर्तेतून वाचवावे अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी रोहिणीताई खडसे म्हणाल्या अतिवृष्टीमुळे शेतात उभ्या असलेल्या मका सोयाबिन कापुस उडीद मुग भुईमूग ई पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले असूनशेतकरी बांधवाचा हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. शेतकऱ्यांनी जिवापाड मेहनत घेऊन लाखोंचा खर्च करून शेत शिवारात पिक उभे केले होते. परंतु आता काढणीला आलेले पिक वाया गेले आहे. यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. आधीच हमीभावाच्या समस्यांनीग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांवर आता ओल्या दुष्काळाचे संकट कोसळले आहे. या कठीण प्रसंगी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे गरजेचे आह. या संकटातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी शासनाने त्वरित पावले उचलुन आचार संहिता लागण्या पुर्वी सरसकट हेक्टरी भरीव आर्थिक मदत देऊन शेतकरी बांधवांना या संकटातुन बाहेर काढावे असेही रोहिणीताई खडसे म्हणाल्या.

यावेळी बोदवड बाजार समितीचे संचालक अंकुश चौधरी, राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार जिल्हा सरचिटणीस प्रविण दामोधरे, तालुका सरचिटणीस रविंद्र दांडगे उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

घरकाम करणाऱ्या महिलेसह साथीदाराला अटक; ४ लाखाचा मुद्देमाल हस्तगत

June 20, 2026
गुन्हे

मुक्ताईनगर तालुक्यात पोलिसांचे ‘ऑपरेशन ड्रॉपकेस’

June 20, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 20 जून 2026 !

June 20, 2026
जळगाव

श्री.धनंजय औंढेकर महावितरणच्या संचालक (संचालन) पदी रुजू

June 19, 2026
गुन्हे

पिकाच्या नुकसानीवरून शेतकऱ्याला मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा

June 19, 2026
गुन्हे

१० कोटींचे कर्ज मंजूर करण्याचे अमिष दाखवत ५ लाखात गंडवले

June 19, 2026
Next Post

जळगाव जिल्हा माहेश्वरी महिला संघटनेला महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी महिला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची सदिच्छा भेट !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

विहित कालावधीत कामे पूर्ण न झाल्यास जबाबदारी निश्चित करणार : जिल्हाधिकारी अमन मित्तल !

February 8, 2023

डॉ. हेडगेवार नगर ग्रामपंचायतचे उपसरपंच चंदन पाटलांनी घेतली भास्करराव पेरेपाटील यांची सदिच्छा भेट !

January 4, 2024

शाळा, मंदिरं टप्प्याटप्यात उघडणार : राजेश टोपे

October 10, 2020

पत्राचाळ प्रकरण : संजय राऊतांना ८ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी !

August 4, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group