मुंबई (वृत्तसंस्था) देवेंद्र फडणवीस हे अत्यंत संयमी नेते आहेत. त्यांना काही वाटत असेल किंवा गैरसमज झाले असतील तर त्यांनी ते व्यक्त करायला हवेत. त्यांनी अशा गोष्टी मनात ठेवू नयेत, अशी अपेक्षा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांना देवेंद्र फडणवीसांना सल्ला काय द्याल, अशी विचारणा पंकजा यांना करण्यात आली. त्यावेळी पंकजा मुंडे यांनी हे वक्तव्य केले.
या कार्यक्रमात पंकजा यांना तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचे आहे का? असा प्रश्न विचारला असता त्यांनी आपणाला सध्य़ाची परिस्थिती पाहता आपणाला अजिबात नाही मुख्यमंत्री व्हायचं नाही असं त्या म्हणाल्या आहे. मात्र, याआधी एकदा मुंडे यांनी ‘मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहे’ असं वक्तव्य होतं. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती शिवाय त्यांच्या या वक्तव्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि मुंडे यांच्यामध्ये तर दोघांमध्ये अबोला होता अशा देखील चर्चांना त्यावेळी उधाण आलं होतं.
दरम्यान, याच कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल वक्तव्य केलं असून ते चांगलेचं चर्चत आहे. या कार्यक्रमात तुम्ही फडणवीसांना काय सल्ला द्याल, असा प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या, ‘देवेंद्र फडणवीस हे अत्यंत संयमी नेते आहेत. मात्र, त्यांनी एखाद्याबद्दल काही वाटत असेल, गैरसमज होत असतील तर ते बोलून दाखवाव, मनात काही ठेवू नये. असा सल्ला त्यांनी यावेळी फडणवीस यांना दिला. त्यांच्या या सल्ल्याची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरु आहे.