पटना (वृत्तसंस्था) एका विवाहितेने तिच्या दोन मुलांना सोडून देत प्रियकरासह (Lover) पळ काढला आहे. पत्नीच्या (Wife) जाण्याने पती (Husband) इतका अस्वस्थ झाला आहे की, पळून गेलेल्या पत्नीला परत आणण्यासाठी त्याने गावकरी आणि पोलिसांकडे विनवणी सुरू केली आहे. हे प्रकरण बगहा (Bagaha) येथील नौरंगिया पोलीस स्टेशन परिसरातील पंचफेडवा येथील आहे.
पतीचे नाव ओमप्रकाश रावचे असून तो जयपूरमधील एका कापड कारखान्यात मजूर म्हणून काम करतो. पीडित पतीने सांगितलं की, तो कामासाठी जयपूरला गेला होता, घरी परतल्यावर त्याची पत्नी तिच्या प्रियकरासह पळून गेली होती. यानंतर तो इतका भडकला की, पोलिस स्टेशनपासून ते डीएसपी आणि एसपी ऑफिसपर्यंत त्याने फेऱ्या मारायला सुरुवात केली.
पीडित पती ओम प्रकाश याने नौरंगिया पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आणि पत्नीसह तिच्या प्रियकराला अटक करण्याची पोलिसांकडे मागणी केली. त्याची पत्नी ५० हजारांची रोकड आणि सुमारे दोन लाख रुपये किमतीचे दागिने घेऊन फरार झाल्याचे पीडित पतीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. ओमप्रकाश म्हणतो की, तो त्याच्या दोन मुलांसह एकटा राहिला आहे, आता त्याची पत्नी आणि तिच्या प्रियकराला शिक्षा झाली पाहिजे.
ओमप्रकाश याने सांगितले की, पत्नीला परत आणण्यासाठी त्याने चार वेळा एसपीकडे अर्ज केला आहे. मात्र कारवाई होत नसल्याने तो नाराज आहे. आता ओमप्रकाश यांनी डीआयजींकडे अर्ज करून न्यायाची मागणी केली आहे. कापड कारखान्यात काम करणाऱ्या ओमप्रकाशच्या व्यथा संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय बनला आहे.