नवी दिल्ली (वृत्तसंस्था) जगभरात कोरोनाग्रस्तांची संख्या ही १३ कोटींच्यावर गेली आहे. देशात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू आहे. दरम्यान, कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढतच असतांना गेल्या २४ तासात १ लाख ६१ हजार रुग्णांची नोंद झाली आहे. तर ८७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या १,३५,२७,७१७ वर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. देशात सध्याच्या घडीला १२ लाख ६४ हजार ६९८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. सोमवारी देशात एकाच दिवसात १ लाख ६८ हजार ९१२ कोरोना रुग्ण आढळले असून आतापर्यंतचा हा उच्चांक मानला जात आहे. १८ ऑक्टोबरपासूनचा हा उच्चांकी आकडा आहे.
देशात आतापर्यंत १ कोटी ३५ लाख २७ हजार ७१७ करोना रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर १ लाख ७१ हजार ५८ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान देशात १० कोटी ८५ लाख ३३ हजार ८५ जणांचं लसीकरण झालं आहे.