मुंबई (वृत्तसंस्था) नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो ही देशातील मोठी संस्था आहे. याचे जाळे भारतभर आहे. ड्रग्ज कनेक्शनमध्ये अनेक बड्या नेत्यांच्या मुलांची नावे आहे. या संदर्भात खोलवर चौकशी केली पाहिजे, असे वक्तव्य गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केले आहे. ते एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
मुंबईत ड्रग्जची कीड अनेक वर्षांपासूनची कीड आहे. सुशांतसिंह प्रकरणामुळे अनेक गोष्टी समोर होत आहे. त्यांची योग्य ती चौकशी होईल. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो ही देशातील मोठी संस्था आहे. याचे जाळे भारतभर आहे. ड्रग्ज कनेक्शनमध्ये अनेक बड्या नेत्यांच्या मुलांची नावे आहे. या संदर्भात खोलवर चौकशी केली पाहिजे. अनिल देशमुख पुढे म्हणाले, मुंबई पोलिसांनी सुशांत प्रकरणाचा तपास चांगल्या प्रकारे केला आहे, असे सुप्रीम कोर्टाने देखील म्हटले आहे. परंतू प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करायचे असे काही मंडळीनी ठरवले आहे. ‘सुशांतसिंहच्या आत्महत्येनंतर त्याच्या कुटुंबियांनी कोणावरही संशय नाही असे लिहून दिले होते, मग गुन्हा कोणावर दाखल करायचा, देखील देशमुख म्हणाले.