मुंबई (वृत्तसंस्था) महाविकास आघाडी सरकार आम्ही पाडणार नाही. हे सरकार स्वतः पडणार, असल्याचा दावा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केला आहे.
सरकार आम्ही पाडणार नाही पण हे सरकार कधी पडणार हे उद्धव ठाकरे यांना कळणारही नाही असा टोला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी लगावला आहे. सरकार पडलं तर अराजकता पसरेल असे विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात केले होते. या मताशी मी सहमत नसल्याचे आठवले म्हणाले. तसेच जीएसटी पैसा राज्याला मिळाला पाहिजे या उद्धव ठाकरे यांच्या मताशी सहमत असून त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आठवले म्हणाले. सरकार पडेल इतिहास घडेल. महाविकास आघाडी सरकार आम्ही पाडणार नाही. हे सरकार स्वतः पडणार असे ते म्हणाले. सरकार खुद गीर जायेगे, महाविकास आघाडी हार जायेगी अशा शब्दात त्यांनी हे स्पष्टीकरण केलं. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे एक दिवस भूकंप होणार असल्याचा इशारा आठवलेंनी दिला आहे.
















