बलरामपूर (वृत्तसंस्था) हाथरस येथील १९ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर उत्तर प्रदेशातीलच बलरामपूरमध्ये एका २२ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केल्याचे समोर आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे.
येथील दोन मुलांनी मैत्रीच्या बहाण्याने मुलीला बोलावून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. हे घृणास्पद कृत्य केल्यानंतर दोन्ही आरोपींनी या मुलीला कंबर आणि पाय मोडलेल्या गंभीर अवस्थेत सायंकाळी एका रिक्षाचालकाने मुलीला बेशुद्ध अवस्थेत तिच्या घराजवळ सोडले. कुटुंबीयांनी मुलीला रूग्णालयात तातडीने दाखल करण्याचा प्रयत्न केला. पण वाटेतच तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.