धरणगाव (प्रतिनिधी) गेल्या अनेक दिवसांपासून शहरात पिसाटलेल्या कुत्र्यांनी मोठा हैदोस घातला असून शहरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पिसाटलेला कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अश्या मागणीचे निवेदन पालिका प्रशासनाचे कार्यालयीन अधीक्षक भिकन पारधी साहेब यांना आज देण्यात आले.
गेल्या महिनाभरात शहरातील पिसाटलेल्या कुत्र्यांनी अनेकांना चावा घेतला असून सामान्य जनतेत मोठी भिती निर्माण झाली आहे. आज दुपारीच चार वाजता लहान माळी वाडा शेजारी नवेगावात आनंद पाटील यांचा पाच वर्षीय मुलास घरच्या ओट्यावर खेळत असताना पिसाटलेल्या कुत्र्यांनी हाताला चावा घेऊन गंभीर दुखापत केली. घडलेला प्रकार पाहून परीसरातील असंख्य नागरीक भयभीत झाले आहेत. वारंवार होत असलेल्या ह्या प्रकारामुळे सामान्य जनतेत तीव्र संताप व्यक्त होत असून पालिका प्रशासन विषयी चिड व्यक्त होत आहे. तरी सदर प्रकार आणखी होऊ नये म्हणून पिसाटलेल्या कुत्र्यांचा त्वरीत बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी शहरवासीयांकडून होत आहे.
सदर निवेदनावर भाजपाचे माजी शहर अध्यक्ष व जेष्ठ पत्रकार कडू महाजन,माजी उपनगराध्यक्ष दिपक वाघमारे, वाल्मीक पाटील, सिताराम मराठे, सुमित मराठे, दिलीप पाटील, आबा पाटील, जितेंद्र पाटील, हेमु चौधरी, पंकज पाटील, समाधान पाटील, समाधान चौधरी, गोकुळ पाटील, राज चौधरी, भुऱ्या धोबी, रिकु पाटील, विनोद पाटील, भैय्या चौधरी, योगराज महाजन, सोनु महाजन, योगेश मराठे, जितेंद्र महाजन, यशवंत चौधरी यांच्यासह आदींच्या सह्या आहेत. आपल्या मागण्याचा नक्कीच विचार करण्यात येईल. तसेच सदर मागणी वरिष्ठपर्यंत पोहचतो, असे आश्वासन पालीका प्रशासनाचे अधिकारी श्री. पारधी यांनी दिली.