वाशीम (वृत्तसंस्था) मानोरा तालुक्यातील कार्ली येथील युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना आज २७ रोजी घडली. शंकर भाऊराव पत्रे असे मृतकाचे नाव आहे.
कार्ली येथील नाल्यावर खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या शंकर व काही मित्र २५ सप्टेंबरच्या रात्री गेले होते. मात्र तो परतलाच नसल्याने कुटुंबियांनी हरविल्याची तक्रार दिली. दरम्यान, बुधवारी शंकर हा नसिकेश विष्णु राठोड यांचे शेताचे धुऱ्यावर मृत अवस्थेत आढळला. विजेचा धक्का लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा संशय मृतकाची आई चंद्रकला पत्रे यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत नमूद केले. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करुन प्रकरण तपास सुरु केला आहे.