श्रीगोंदा (जि. अहिल्यानगर) – शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक करून तब्बल सहा महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला श्रीगोंदा पोलिसांनी अखेर अटक केली आहे.
याबाबत फिर्यादी अशोक बाजीराव भोसले (रा. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) यांनी दिनांक २३ नोव्हेंबर २०२५ रोजी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार रुपेश अशोक पवार (रा. कानमंडळे, ता. चांदवड, जि. नाशिक) याने स्वामी बाळासाहेब पिसे यांच्या मध्यस्थीने श्रीगोंदा व कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला. ‘रुपेश पवार फाऊंडेशन’च्या माध्यमातून शासकीय सोलर पंप मिळवून देण्याचे आमिष दाखवून विविध शेतकऱ्यांकडून एकूण ७ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार होता. दरम्यान, आरोपी मुंबई येथे असल्याची माहिती पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली. त्यानुसार तपास पथकाला शोध मोहीम राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या. आरोपीने पोलिसांना सलग तीन दिवस चकवा दिला. मात्र तो आपल्या मूळ गावी परतल्याची माहिती मिळताच तपास पथकाने वेशांतर करून कानमंडळे (ता. चांदवड, जि. नाशिक) येथून त्याला ताब्यात घेतले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविणचंद लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या नेतृत्वात पार पडली. या कारवाईत पोना/1570 गहिनीनाथ यादव, पोकॉ/2565 संदिप राऊत, पोकॉ/367 महादेव कोहक, पोकॉ/912 सचिन वारे, पोकॉ/270 अरुण पवार, पोकॉ/2801 विवेक दळवी तसेच दक्षिण मोबाईल सेलचे पोकॉ राहुल गुंडु यांनी सहभाग घेतला.
पुढील तपास पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश आहिरे व पोना गणेश गाडे करत आहेत.
















