TheClearNews.Com
Tuesday, March 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

संतापजनक : १५ दिवसात धरणगावात ४०० वीज कनेक्शन तोडले ; हप्ते पाडून देण्यास महावितरणचा नकार !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 19, 2021
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) कोरोनाच्या काळात नागरिकांचे आर्थिक कंबरडे मोडलेले असताना महावितरणकडून थकबाकीदारांचे कनेक्शन तोडण्याची विशेष मोहीम सुरु आहे. त्यानुसार मागील १५ दिवसात साधारण ४०० कनेक्शन तोडण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. सर्वात संतापजनक बाब म्हणजे ग्राहकांना वीज बिल भरतांना कोणतीही सवलत किंवा हप्ते पाडून दिले जात नाहीय. दरम्यान, कोरोनाचा कठीण काळ लक्षात घेता वीज तोडणी मोहीम तत्काळ थांबवावी, अशी मागणी जनतेतून होत आहे.

कोरोना आणि टाळेबंदीच्या काळात व्यापारी, सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटांचा सामना करावा लागला आहे. या परिस्थितीला तोंड देत आता कुठे तरी जनता सावरत आहे. पण, महावितरणकडून टाळेबंदीच्या काळातील वाढीव विजबिले देण्यात आली. सुरुवातीला सरकारने वीज बिल माफीच्या भूलथापा दिल्या. मात्र, वीज बिल न भरणाऱ्या शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. सरकारला जनतेची अवस्था समजत नाही का?, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. महावितरणकडून वीज बिलांमध्ये दुरुस्ती करून देण्यात यावी. तसेच तोपर्यंत एकही कनेक्शन तोडले जाऊ नये, अशी मागणी जनतेतून होत आहे. वीज वितरण कंपनीच्या वतीने ग्राहकांना सवलत देण्याऐवजी उलट शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेची वीज तोडणी सुरू आहे. या विरोधात धरणगावकरांमध्ये प्रचंड नाराजी आहे. सक्तीची वीज बिल वसुलीचा त्रास शेतकरी आणि सर्व सामान्य जनतेला होत आहे. त्यामुळे वीज तोडणी तत्काळ थांबवा या मागणीसाठी भविष्यात आंदोलन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वीज महामंडळाने वीज कनेक्शन तोडणी तत्काळ थांबवले पाहिजे, अशी मागणी होत आहे.

READ ALSO

नवीन बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

रेशनपासून वंचित नागरिकांची थेट तहसील कार्यालयावर धडक

 

सरकारला शेतकऱ्यांची अवस्था समजत नाही का?, लोकांना सध्या रोजगार नाहीय. दुसरीकडे शेतीच्या कामांची लगबग सुरु आहे. अशा काळात वीज कनेक्शन तोंडने प्रचंड संतापजनक बाब आहे. वीज तोडणी मोहीम तत्काळ थांबली नाही. तर भाजपला रस्त्यावर उतरावे लागेल.

-अॅड.संजय महाजन (जिल्हाध्यक्ष भाजप ओबीसी आघाडी)

 

कोरोनामुळे राज्यात लाॅकडाऊन असून, तो अजून पूर्ण उठलेला नाही. अनेक छोट्या व्यावसायिकांची आर्थिक घडी सुरळीत नाही. शेतकरी हवालदिल झाला आहे. यामुळे सक्तीची वीजबिल वसुली, कनेक्शन तोडणी तत्काळ थांबवण्यात यावी, अशी राष्ट्रवादीची मागणी आहे. याबाबत लवकरच आम्ही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी संपर्क साधणार आहोत.

-दीपक वाघमारे (जिल्हाउपाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस )

 

धरणगावातील वीज तोडणी मोहीम बाबत पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्याशी चर्चा करून दोन हप्त्यांमध्ये ग्राहकांना सुट देण्यात यावी अशी मागणी करणार आहे. यामुळे ग्राहकांना दिलासा मिळेल.

पप्पू भावे (पालिका गटनेते, शिवसेना)

 

कोरोनाच्या महामारीत लॉकडाऊनमुळे उद्योग, व्यासायीकांसह रोजंदारीवर काम करणाऱ्या नागरिकांची आर्थिक स्थिती खालावलेली आहे. त्यामुळे विज बिल भरणे काही नागरिकांना शक्य होत नाहीय. त्यामुळे वीज कनेक्शन खंडित करणे महावितरण त्वरित थांबवले पाहिजे. यासंदर्भात आम्ही जिल्हा काँग्रेसतर्फे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याशी संपर्क साधणार आहोत.

चंदन पाटील (तालुका उपाध्यक्ष, कॉंग्रेस)

मागील १५ दिवससात साधारण ३५० ते ४०० कनेक्शन थकबाकी असल्यामुळे तोडण्यात आले आहेत. दिवसाला साधारण १५ ते २० वीज कनेक्शन तोडले जात आहेत. वीज बिल हप्त्यांमध्ये विभागणी करण्याची आम्हाला कोणतीही सूचना नाहीय. त्यामुळे संपूर्ण बिल भरने आवश्यक आहे.

एम.पी. धोटे (सहाय्यक अभियंता, महावितरण, धरणगाव)

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

नवीन बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

February 28, 2026
धरणगाव

रेशनपासून वंचित नागरिकांची थेट तहसील कार्यालयावर धडक

February 25, 2026
धरणगाव

महाशिवरात्रीनिमित्त धरणगावकरांना लाभले १२ ज्योतिर्लिंग दर्शन

February 17, 2026
धरणगाव

जिल्ह्यात 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज – पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 13, 2026
धरणगाव

भोले सरकार भक्त परिवाराच्या वतीने महाशिवरात्रीचे भव्य आयोजन

February 11, 2026
धरणगाव

महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करा; माळी समाजाकडून धरणगाव तहसीलला निवेदन

February 10, 2026
Next Post

दिलासादायक : जिल्ह्यात आज आढळले अवघे ६ कोरोनाबाधित, ७ झाले बरे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट ; तरुणाविरुद्ध बोदवड पोलिसात गुन्हा !

October 1, 2023

ग्रामसमृद्धी योजना गैरव्यवहार : पंचायतराज समितीच्या अजेंड्यावर घेणार ; आ. किशोरआप्पा पाटलांचे आश्वासन

September 27, 2021

जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादीला जबर धक्का ; संजय गरुड यांचा भाजपात प्रवेश !

January 30, 2024

प्रेयसीचा खून करून प्रियकर पसार ; आईच्या घरासमोरच ठेवला मुलीचा मृतदेह !

September 12, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group