TheClearNews.Com
Sunday, August 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अनुभूती बालनिकेतन विद्यानिकेतन च्या शिक्षकांची ‘पालकांशी थेट भेट

विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन शिक्षक साधतात पालकांशी संवाद

vijay waghmare by vijay waghmare
August 23, 2026
in जळगाव, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव, (प्रतिनिधी) – विद्यार्थ्यांचे शिक्षण केवळ वर्गखोलीपुरते मर्यादित न ठेवता त्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी शाळा, शिक्षक आणि पालक यांच्यातील संवाद अधिक दृढ असणे गरजेचे आहे. याच शैक्षणिक जाणिवेतून अनुभूती बालनिकेतन व विद्यानिकेतन स्कूलने ‘पालकांशी थेट संवाद’ हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. “विद्यार्थ्याला समजून घेण्यासाठी केवळ वर्गातील निरीक्षण पुरेसे नाही; त्याचे घर, कुटुंब, दिनचर्या, सवयी आणि भावनिक जग समजून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. याच उद्देशाने अनुभूती बालनिकेतनने Home Visit ही संकल्पना राबवली आहे.”
विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शाळेतील वातावरणाइतकेच घरातील वातावरण महत्त्वाची भूमिका बजावते. बालवयात मुलांच्या मनावर चांगल्या संवाद, सवयी, वागणूक आणि विचारांचा मोठा प्रभाव पडतो. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या थेट घरी जाऊन पालकांशी संवाद साधून त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी मार्गदर्शन करण्याचा असा उपक्रम राबविणारी अनुभूती बालनिकेतन ही एकमेव स्कूल आहे. बालनिकेतन मॉन्टेसरीमधील ३ ते ६ वयोगटातील विद्यार्थी तर विद्यानिकेतन मधील इयत्ता पहिली व इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांंसाठी हा उपक्रम मोलाचा ठरत आहे.

शिक्षण म्हणजे केवळ गुण मिळविणे नव्हे, तर संवेदनशील, आत्मविश्वासू, शिस्तप्रिय आणि जबाबदार व्यक्तिमत्त्व घडविणे या व्यापक संकल्पनेला या उपक्रमातून मूर्त रूप दिले जात आहे, असे प्राचार्य मनोज परमार यांनी सांगितले. त्यासाठी अनुभूती बालनिकेतन मॉन्टेसरीच्या अवनि जैन, किर्ती पगारिया, हिमानी बारी, सोनिया शर्मा, पंपा खारा या शिक्षिका पालकांपर्यंत पोहचवून चर्चा करित आहेत. या भेटीदरम्यान शिक्षक पालकांशी विद्यार्थ्यांच्या अभ्यासाबरोबरच त्यांच्या भावनिक, सामाजिक, मानसिक आणि शारीरिक विकास, समस्यांबाबत संवाद साधत आहेत. मुलांसमोर कोणत्या विषयांवर बोलावे, कोणत्या गोष्टी टाळाव्यात, मुलांशी संवाद कसा साधावा, त्यांच्यासोबत कोणते खेळ खेळावेत, त्यांना कोणत्या चांगल्या सवयी व मूल्यांची ओळख कशी करून द्यावी, तसेच स्क्रीन टाईम, परिवारातील इतर सदस्यांसोबत मुलांचे नाते, याबाबत पालकांंना मार्गदर्शन केले जात आहे. मुलांना सतत सूचना देण्यापेक्षा त्यांच्यासोबत वेळ घालवणे, खेळणे, त्यांच्या प्रश्नांना समजून घेणे, त्यांच्या भावना ऐकून घेणे आणि योग्य-अयोग्य यातील फरक प्रेमाने समजावून सांगणे या बाबींवरही शिक्षिका पालकांशी संवाद साधत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्यासोबतच त्यांचा मानसिक आणि शारीरिक विकास अधिक सक्षम होण्यास मदत होत आहे. या भेटीनंतर पालकांनी शाळेचे कौतुक करत समाधान व्यक्त केले.

READ ALSO

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

महात्मा गांधीं’मुळे लेखक झालो – संतोष नागो शिंदे

कोट…

‘शाळा, घर, शिक्षक, पालक यांच्यातील दुवा अधिक मजबूत झाला, तर विद्यार्थ्यांचे भवितव्य निश्चितच उज्ज्वल होईल, या विचारातून राबविण्यात येणारा हा उपक्रम शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण ठरत असल्याची प्रतिक्रिया संचालिका सौ. निशा जैन यांनी दिली.

चौकट..

घर-शाळेच्या संवादातून बालकाचा सर्वांगीण विकास
‘पालकांशी थेट संवाद’ उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या शाळेतील दैनंदिन दिनचर्या, अभ्यासाची सवय आणि खेळासाठी दिला जाणारा वेळ, विद्यार्थी स्वतःची कामे किती स्वतंत्रपणे करतो, अभ्यासाची जागा आणि त्यातील सहजता समजणे, घरगुती कामांमध्ये सहभाग व इतरांना मदत करण्याची सवय, विद्यार्थ्याच्या आहाराच्या सवयी, आवडी-निवडी आणि स्वतः जेवण्याची सवय, विद्यार्थ्याची झोप व दुपारच्या विश्रांतीची दिनचर्येसोबत मोबाईल, टीव्ही किंवा इतर स्क्रीनचा वापर किती आणि पालकांच्या देखरेखीखाली होतो का, यावर विश्लेषणात्मक चर्चा केली जाते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonAnubhuti Balniketan Vidyaniketan Teachers’ ‘Direct Interaction with Parents

Related Posts

गुन्हे

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

August 23, 2026
जळगाव

महात्मा गांधीं’मुळे लेखक झालो – संतोष नागो शिंदे

August 23, 2026
गुन्हे

शेतीच्या वादातून चौघांकडून बाप-लेकाला मारहाण

August 23, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी चार जणांवर गुन्हे दाखल ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात

August 22, 2026
जळगाव

महावितरणचे संचालक श्री. राजेंद्र पवार यांना राष्ट्रीय ‘एमिनेंट इंजिनियर’ पुरस्कार प्रदान

August 22, 2026
जळगाव

विद्यापीठ स्तरीय उत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारी सेवा गौरव पुरस्काराने संजय तोडे सन्मानित

August 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

वीज दर सवलत अर्ज नोंदणीस २८ फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ

February 22, 2021

जिल्ह्यात ८ सप्टेंबरपर्यंत ३७ (१) (३) कलम लागू

August 24, 2021

ब्रेकिंग न्यूज : आ. मंगेश चव्हाण यांची गुटखा माफीयांसह पोलीस अधिकारी व कर्मचारींविरुद्ध फिर्याद !

October 17, 2020

बोगस मतदार प्रकरणी ॲड.पियुष पाटील यांची ना.उच्च न्यायालयात धाव

December 9, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group