
जळगाव (प्रतिनिधी) – भांडणाचा त्रास होत असल्याच्या कारणावरुन भाग्यश्री गोपाल खैरनार (वय ३७, रा. गणपती नगर, सावखेडा रोड, पिंप्राळा) यांच्यासह त्यांची आई व भावाला दोघांनी शिवीगाळ करीत बेदम मारहाण केली. ही घटना दि. २३ जून रोजी रात्री दहा वाजता घडली. याप्रकरणी दोघांविरुद्ध रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील सावखेडा रस्त्यावर असलेले गणपती नगरात भाग्यश्री खैरनार या वास्तव्यास आहे. दि. २३ जून रोजी साई कल्पना रेसीडेन्सी येथे भाग्यश्री खैरनार यांच्या आईचे घरातील भांडणाच्या कारणावरुन दोघांनी त्यांना मारहाण केली.
तसेच त्यांच्या आई व भावाला मारहाण करीत जखमी केले. तर संशयित गणेश पाटील याने भाग्यश्री यांच्या आईच्या बोटाची करंगळी पिरगळून फ्रैक्चर करत आमच्या नादाला लागले तर तुम्हाला जीवंत सोडणार नाही अशी धमकी देखील दिली. हे भांडण सुरु असतांना संशयितांनी त्यांचा मोबाईल फोन देखील चोरुन नेला. दरम्यान, भाग्यश्री खैरनार यांनी दि. ५ जुलै रोजी रामानंद नगर पोलिसात तक्रार दिली असून संशयित समाधान बाविस्कर व गणेश पाटील व अन्य दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक संजय शेलार हे करीत आहे.
















