धरणगाव (प्रतिनिधी) मागील काही दिवसांपूर्वी भाटीया परिवार “द काश्मीर फाईल्स” हा सिनेमा पहावयास जळगाव गेले होते. हेमंत भाटीया यांनी मुख्यमंत्र्याचा विरोधात काही तरी आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्याचा आरोप करीत त्या परिवाराला सिनेमा गृहाच्या बाहेर येताच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मारहाण केली व तशा पध्दतीचे व्हिडीओ सुद्धा त्यांनी दहशत पसरविण्यासाठी प्रसारित केला.
या मारहाणीमुळे भाटीया कुटुंब अतिशय घाबरले व ते कायमचे धरणगाव सोडून जात होते.परंतु त्याना गावातील काही समाजसेवकांनी धीर देऊन हल्ला करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यास सांगितले यासाठी त्यानी भारतीय जनता पार्टीचे ओबीसी जिल्हाध्यक्ष अँड संजयभाऊ महाजन व शहराध्यक्ष दिलीप महाजन यांना सोबत घेत गुन्हा दाखल केला परंतु पोलिस प्रशासनाने मुळ फिर्यादी प्रमाणे गुन्हा नोंद करून घेतला नाही पीडित गौरी दुतीया यांना मारहाण करणाऱ्या शिवसेनेच्या पदाधिकारीनीं नको त्या ठिकाणी हात लावत धक्का बुक्की करून त्यांचा विनयभंग केला असून देखील तशा प्रकारचा गुन्हा मारहाण करणाऱ्या आरोपींवर दाखल झालेला नाही.उलट भाटीया परिवारावरच मंगळसूत्र तोडले व मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला महिलेचा विनयभंग होऊन देखील गुन्हा दाखल नकरता त्यांना त्रास व्हावा ही द्वेष भावना ठेऊन त्यांचा विरुद्ध खोटा गुन्हा दाखल केला गेला.
या अगोदर देखील धरणगावात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अश्या प्रकारचे खोटे गुन्हे अनेकांवर दाखल केले आहेत असा अन्याय कुठं पर्यंत सहन करायचा. याच अन्यायाला वाचा फोडण्यासाठी भारतीय जनता पार्टीने धरणगाव शहरात महिला सन्मान मुक मोर्चाचे आयोजन केले होते मुक मोर्चा बालाजी महाराज मंदिरा पासून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारका पर्यंत होता.
निवेदनातील प्रमुख मागण्या
▪️मारहाण करणाऱ्या आरोपीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात यावा.
▪️मंगळसूत्र व सोन्याची चैन तोडून हिसकावून घेतल्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा.
▪️भाटीया परिवारावरील खोटा गुन्हा मागे घेण्यात यावा अश्या प्रमुख मागण्या निवेदनाव्दारे करण्यात आल्या आहेत.
महिला सन्मान मुक मोर्चाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक गटनेते कैलास माळी सरानी केले तसेच नगरसेवक ललित येवले, रिपाईच्या जिल्हाउपाध्यक्ष दीक्षा गायकवाड, गौरी दुतीया, ओबीसी तालुकाध्यक्ष सुनिल चौधरी, जि.प.सदस्या माधुरीताई अत्तरदे, ओबीसी जिल्हाध्यक्ष अँड.संजय महाजन, जिल्हाउपाध्यक्ष पी.सी.आबा पाटील यांनी झालेल्या अन्यायावर आपले मनोगत व्यक्त केले. मोर्चासाठी भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी व धरणगाव शहरातील नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.