बोदवड (प्रतिनिधी) बोदवड नगरपंचायत सत्ताधाऱ्यांकडून विरोधक नगरसेवकांच्या वार्डातील कामे रखडली जावी व गावातील विकास थांबावा या हेतूने सत्ताधारी पक्ष व नगराध्यक्ष स्थायी समीतीची सभा घेण्यास टाळाटाळ करत असल्यामूळे नगरपंचायती समोर राष्ट्रवादीच्या पक्षातर्फे साखळी उपोषण सुरू करण्यात आले.
शहरातील प्रभाग क्र. २ मधील आर सी सी गटार बांधकाम, प्रभाग क्र. ८ मधील आर सी सी गटार बांधकाम, प्रभाग १४ मधीत आर सी सी गटार बांधकाम, प्रभाग क्र. ४ मधील रस्ता काँक्रेटीकरण,प्रभाग क्र. १५ मधील गट क्र. ४२४ मधील ओपन स्पेस ला प्लास्टर, पेव्हर ब्लॉक व सूशोभिकरण करणे, प्रभाग क्र. ३ मधील गट नं १७९ मधील ओपन स्पेस ला वॉल कंपाऊंड बांधकाम करणे, प्रभाग क्र. ७ मधील गट नं २७/१ मधील ओपन स्पेस ला वॉल कंपाऊंड बांधकाम करणे या कांमांची निविदा होऊन बरेच दिवस झालेले आहे कमी दराच्या निवीदांना स्थायी समीतीची मंजूरी आश्यक असल्याने मुख्याधिकारी यांनी नगराध्यक्षांना दि. १० जानेवारीला स्थायी समीतीची सभा घेण्याचे पत्र दिले होते. परंतू विरोधक नगरसेवकांच्या वार्डातील कामे असल्याने स्थायी समीतीची सभा घेण्यास हेतूपूरस्सर टाळाटाळ करून शहरातील विकासकामे रखडण्याचा प्रयत्न सत्ताधारी नगरसेवक व नगराध्यक्ष यांच्याकडुन होत असल्याने राष्ट्रवादीचे गटनेते जफर शेख, नगरसेवक कडूसिंग पाटील, योगीती खेवलकर, सैय्यद हकीम बागवान, पूजा पारधी, एकता निंबोळकर, मुजम्मिल शाह, दिपक झांबड यांनी नगरपंचायतीसमोर साखळी उपोषण सुरू केले. उपोषणाचा पहील्या दिवशी उपोषणस्थळी राष्ट्रवादीच्या महीला प्रदेशाध्यक्षा रोहीणी खडसे यांनी भेट दिली.
यावेळी त्यांनी गलीच्छ राजकारण करून सत्ताधाऱ्यांचा शहराचा विकास रोखण्याचा प्रयत्न आहे असें मत व्यक्त केले. विधानपरीषदेचे आमदार एकनाथराव खडसे यांच्या निधितून मंजूर झालेल्या शहरातील विकासकामांना स्थायी समीतीमध्ये परवाणगी न देणे हे शहराचा विकास रोखण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न आहे. म्हणून सत्ताधाऱ्यांनी लवरात लवकर स्थायी समीतीची मान्यता न दिल्यास आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असे सांगितले.
सत्ताधारी हेतूपुरस्सर शहराचा विकास रोखण्याचा प्रयत्न करत आहे. नगराध्यक्षांना आमदारांचा दबाव असल्याने स्थायी समीतीची सभा घेण्यास नगराध्यक्ष टाळाटाळ करत आहे. अनेक चांगल्या कामांमध्येही राजकारण करून शहराचा विकास रोखण्यासाठी हे प्रयत्न करत असल्याने आता संवेधानिक मार्गाने आम्ही साखळी उपोषणास सूरवात केली आहे, असे गटनेते जफर शेख यांनी सांगितले. तर माजी गटनेते कैलास चौधरी यांनी प्रतिक्रिया दिली की मागील कालखंडात आम्ही सत्ता उपभोगली असून आम्ही विरोधकांना सोबत घेवून कामे केली आहे. नेहमी आमचे शहराच्या विकासावर लक्ष असायचे परंतू आताचे सत्ताधारी गलीच्छ राजकारण करत असल्याने हे शहराच्या विकासासाठी धोक्याचे आहे.