TheClearNews.Com
Friday, August 1, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शेतकर्‍यांसह सर्वसामान्यांना उभारी देणारा अर्थसंकल्प : आ. गिरीश महाजन

The Clear News Desk by The Clear News Desk
February 1, 2022
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेला अर्थसंकल्प हा कोविडच्या आपत्तीतही शेतकर्यांसह सर्वसामान्यांना उभारी देणारा असून यातून देशाचा चौफेर विकास साधण्यासाठी विविध क्षेत्रांसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. हा अर्थसंकल्प आत्मनिर्भर भारताच्या दिशेने टाकलेले एक दमदार पाऊल असल्याची प्रतिक्रिया माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी व्यक्त केली आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाचे आ. गिरीश महाजन यांनी स्वागत केले आहे. अर्थसंकल्पाबाबत प्रतिक्रिया व्यक्त करतांना ते म्हणाले की, सध्या देशावर कोविडच्या आपत्तीचे संकट असतांनाही शेतकरी, शेतमजूर, कामगार आदींसह सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारे अनेक निर्णय आज सरकारने जाहीर केले आहेत.

READ ALSO

२ ऑगस्टला बालरंगभूमी परिषदेतर्फे साजरा होणार बालकलाकारांचा हक्काचा दिवस

म.सा.प.निमंत्रित सदस्यपदी धरणगांवचे प्रा.बी.एन.चौधरी :

यातील सर्वात लक्षणीय बाब म्हणजे केंद्र सरकारने कडधान्य मोठ्या प्रमाणात खरेदी केले असून याचे मूल्य शेतकर्यांना थेट आपल्या खात्यामध्ये मिळणार आहेत. रासायनिक खतांनी मुक्त असणार्या शेतीला यंदाच्या अर्थसंकल्पात प्राधान्य देण्यात आले आहे. या अनुषंगाने कृषी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांमध्ये आता नैसर्गिक शेती, झीरो बजेट शेती आदी विषयांचा समावेश करण्यात येणार असल्याची बाब अतिशय महत्वाची अशीच आहे. अर्थमंत्र्यांनी किसान ड्रोनच्या माध्यमातून आधुनीक शेतीसाठीची तरतूद देखील केलेली आहे. शेतीसोबत यंदाच्या अर्थसंकल्पात रोजगारालाही प्राधान्य देण्यात आले असून वर्षभरात ६० लाख नवीन रोजगार निर्मिती होणार आहे. तर लहान व मध्यम व्यावसायिक आणि उद्योजकांसाठी देखील अनेक महत्वाच्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी आधीच आत्मनिर्भर भारताचे व्हिजन मांडले असून निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात याचे प्रतिबिंब उमटल्याचे आ. गिरीशभाऊ महाजन यांनी नमूद केले आहे. यात अर्थव्यवस्थेची प्रगती ही समाधानकारक राहणार असून यंदा झालेले विक्रमी जीएसटी संकलन हे याचेच प्रतीक आहे.

आ. महाजन पुढे म्हणाले की, आजच्या अर्थसंकल्पात कृषी, आरोग्य, पायाभूत सुविधा, रोजगार, कौशल्य विकास आदींसारख्या विविध क्षेत्रांसाठी भरीव तरतूद करण्यात आलेली असून यातून चौफेर विकास साधला जाणार आहे. महाराष्ट्राच्या वाटेलाही यात भरीव तरतुद करण्यात आलेली आहे. यात नागपूर व नाशिक येथील मेट्रोसाठी मोठ्या निधीची घोषणा करण्यात आलेली आहे. तर भुसावळ-खरगपूर कॉरिडॉरमुळे माल वाहतुकीची सुविधा होणार असून याचा स्थानिक शेतकर्‍यांसह व्यापार्‍यांना लाभ होणार आहे.

आमदार गिरीश महाजन पुढे म्हणाले की, प्रथमच शेती करता बॉस सारख्या आधुनिक उपक्रमाचा वापरामध्ये प्रोत्साहन दिलं शिक्षण क्षेत्रात भरीव तरतुदी करून अंगणवाडी पासून ते उच्च शिक्षणापर्यंत जागतिक दर्जाच्या संस्थांना आमंत्रित करून त्यांच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण निर्मितीचा चांगला प्रयत्न करण्यात आला आहे. साठ लाख नोकर्‍या निर्मितीचे उद्दिष्ट ठेवलं उद्योगांना तसंच कर न चुकविणार्‍या यांना जर रेड पडली तर त्यामध्ये जप्त असलेले सर्व साहित्य कायमस्वरूपी जप्तीचा मोठ्या निर्णयाचे स्वागत आमदार गिरीश महाजन यांनी केले आहे. तसेच डिजिटल यंत्र भरीव तरतूद करून याच्या वापराला प्रोत्साहन दिलं तसेच ८० हजार नवीन घरं प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून निर्मितीचे उद्दिष्ट या यावेळी ठेवण्यात आले असून प्रगतीसाठी या बाबी पूरक असल्याचेही आमदार गिरीश महाजन यांनी नमूद केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #girishmahajan

Related Posts

जळगाव

२ ऑगस्टला बालरंगभूमी परिषदेतर्फे साजरा होणार बालकलाकारांचा हक्काचा दिवस

July 31, 2025
धरणगाव

म.सा.प.निमंत्रित सदस्यपदी धरणगांवचे प्रा.बी.एन.चौधरी :

July 31, 2025
जळगाव

150 दिवसांच्या कृती आराखड्यात महावितरणची प्रभावी अंमलबजावणी

July 31, 2025
जळगाव

शानबाग विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घेतला ‘गाईड’ एकांकिकेचा भावस्पर्शी अनुभव

July 30, 2025
क्रीडा

केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसेंच्या हस्ते राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचे उद्घाटन..!

July 30, 2025
जळगाव

मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजनेमुळे शेतीला दिवसा वीजपुरवठा व उद्योगांच्या दरात घट : सीएमडी श्री. लोकेश चंद्र यांची माहिती

July 30, 2025
Next Post

जिल्ह्यात आज आढळले १९१ कोरोनाबाधित, ४६४ झाले बरे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावात वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या !

September 30, 2020

जळगाव परिमंडल: पंतप्रधान सुर्य घर योजनेचे ४१७० प्रस्ताव मार्गी योजनेच्या प्रभावी अमंलबजावणीसाठी मुख्य अभियंता इब्राहिम मुलाणी यांच्या सुचना !

July 25, 2024

आरोग्यवर्धिनी केंद्रासाठी 50 हजारांची लाच मागितली ; पाचोर्‍यातील तालुका वैद्यकीय अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा !

September 4, 2023

धरणगाव येथे क्रांतिकारी खाज्याजी नाईक संस्थेतर्फे कोविड केअर सेंटर तथा विलगिकरण केंद्र शुभारंभ

April 17, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group