TheClearNews.Com
Wednesday, February 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जिल्हा परिषदेच्या गट- गणांच्या गावांमध्ये उलटफेर ; 68 गट, 136 गणांची प्रारूप रचना जाहीर !

vijay waghmare by vijay waghmare
July 15, 2025
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका गेल्या तीन वर्षांपेक्षा अधिक काळापासून रखडल्या आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने आता निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहे. दरम्यान, आज जिल्हा प्रशासनाकडून गट- गणांची प्रारूप रचना जाहिर करण्यात आली आहे. यात जिल्ह्यात एक गट कमी तर दोन गट वाढले आहे. जिल्ह्याची गटसंख्या ही ६८ करण्यात आली असून गणांची संख्या देखील १३६ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता ६८ गटांचे सदस्य निवडून येणार आहेत. विषेश म्हणजे गट-गणांमध्ये मोठे बदल झाले असून गावांमध्ये उलटफेर झाले आहे. त्यामुळे हरकतींसाठी आता सहा दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम आता वाजू लागले असुन निवडणुक पुर्वी प्रशासकीय कामकाजाचा पहिला टप्पा प्रारूप गट-गण रचना जाहिर झाल्याने सुरू झाला आहे. शासनाने १८ ऑगस्टपर्यंत गट व गण रचना पुर्ण करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहे.

READ ALSO

महाशिवरात्रीनिमित्त धरणगावकरांना लाभले १२ ज्योतिर्लिंग दर्शन

मित्र-शिक्षकांसमोर मारहाण; नैराश्यातून विद्यार्थ्याची आत्महत्या

गटांसह गावांमध्ये उलटफेर; गणित बदलणार
गट व गणांसाठी निवडणुक आयोगाने २०१७ च्या निवडणुकांचे निकष कायम ठेवले आहे. त्यानुसार गटांतील मतदार संख्या ४० हजार तर गणांतील मतदार संख्या २० हजार पर्यंत ठेवण्यात आल्याने गटांच्या गावात उलटफेर झाला आहे. विषेश म्हणजे अनेक गटांची नावे बदलली असुन गावांमध्ये देखील उलटफेर झाले असल्याने आता राजकीय गणिते व समिकरणे देखील बदलणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

नशिराबाद गट ‘कट’ भादलीला अनेक गावे जोडली
जळगाव तालुक्यात नशिराबाद नगरपंचायत झाल्याने नशिराबाद गट आता भादली-कुसुंबा झाला असुन त्या गटात असोदा व शिरसोली गटाची काही गावे जोडण्यात आली आहे. मुक्ताईनगर तालुक्यात मुक्ताईनगर-निमखेडा गट कमी झाला असुन त्यात गटातील गावे अन्य दोन गटांमध्ये जोडण्यात आली आहे. जामनेर तालुक्यात शेंदुर्णी नगरपंचायत झाली आहे. त्यामुळे त्या गटातील गावे अन्य गटांमध्ये जोडण्यात आली आहे.

अमळनेर, चाळीसगावात गट बदलले
चाळीसगाव तालुक्यात यापुर्वी ७ गट व १४ गण होते. मात्र यात एक गट व गण वाढला आहे. तर अमळनेर तालुक्यात देखील ४ गट व ८ गण होते. यात देखील १ गट व एक गण वाढला आहे. त्यामुळे पुर्वीच्या गटांमधील गावांमध्ये उलटफेर झाला आहे.

मुक्ताईनगरचा एक गट कमी
मुक्ताईनगर तालुक्यात या पुर्वीच्या २०१७ च्या निवडणुकीत ४ गट व ८ गण होते. मात्र नविन रचनेनुसार ३ गट व सहा गण होणार आहे. मुक्ताईनगरमध्ये ग्रामिणचा काही भाग नगरपंचायतीला जोडला गेला असल्याने येथे एक गट कमी झाल्याचे मानले जात आहे.

अमळनेर, चाळीसगावला एक गट वाढला
नविन रचनेनुसार जिल्हयात एक गट वाढणार आहे. त्यात अमळनेर तालुक्यात गेल्या निवडणुकीत चार गट होते. आता तेथे पातोंडा दहिवद या एक गटाचे दोन गट झाले आहेत. आता तालुक्यात पाच गट होणार आहे. तसेच पंचायत समितीच्या दोन गणांची देखील वाढ होणार आहे. तसेच या पुर्वी चाळीसगाव तालुक्यात ७ गट होते. आता एक घोडगाव हा गट वाढून ८ गट होणार असुन २ गणांची देखील वाढ होणार आहे.

१८ ऑगष्टला अंतिम रचना
गट व गणांची प्रारूप रचना जाहिर झाल्याने आता २१ जुलै पर्यंत हरकतीला वेळ देण्यात आला आहे. अंतिम गट रचना १८ ऑगष्ट रोजी अंतिम केली जाणार आहे.

आता ईच्छुकांचे आरक्षणाकडे लक्ष
जिल्हा परिषदेच्या ६८ गट व १३६ गणांची अंतिम रचना १८ऑगष्टला जाहिर होईल. मात्र आता महत्वपुर्ण टप्पा पार पडल्यानंतर आता सर्व इच्छुकांकडून आता आरक्षणाची प्रतिक्षा आहे. आरक्षण जाहिर झाल्यानंतरच ईच्छुकांसाठी चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे आरक्षणाचा अंदाज आता पासून लावला जात आहे. कोणत्या गटात व गणात या पुर्वी कोणते कोणते आरक्षण होते? आता लोकसंख्येच्या निकषावर कोणते आरक्षण निघेल याचे आडाखे बांधले जात आहे.

चोपडा तालुक्यात सर्व गट बदलली
चोपडा तालुक्यात पुर्वीच्या विरवाडे गटात काही गावांमध्ये बदल झाले आहे. तर अन्य ४गटांमध्ये तर मोठा उलटफेर झाला असुन गणितेच बदलली आहे. गट व गण या दोघांची रचना अन्य गट, गणांशी जोडल्याने चोपडा तालुक्यात सर्वाधिक बदल झाल्याचे दिसते. रावेर तालुक्यात देखील गटांच्या गावांमध्ये बदल झाला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

महाशिवरात्रीनिमित्त धरणगावकरांना लाभले १२ ज्योतिर्लिंग दर्शन

February 17, 2026
गुन्हे

मित्र-शिक्षकांसमोर मारहाण; नैराश्यातून विद्यार्थ्याची आत्महत्या

February 17, 2026
गुन्हे

शास्त्रीनगरमध्ये घरफोडी; सोन्याचे दागिनेसह रोख रक्कम लंपास

February 17, 2026
गुन्हे

शिवीगाळ केल्याच्या रागातून तरुणाचा दगडाने ठेचून खून

February 16, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये भाजपकडून हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध

February 16, 2026
जळगाव

अफवांवर विश्वास न ठेवता स्मार्ट वीजमीटर बसवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 15, 2026
Next Post

घरफोडी करणाऱ्यांना एमआयडीसी पोलिसांनी 48 तासात केली अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

प्रताप तत्वज्ञान केंद्रात गीता जयंती निमित्त तीन दिवसीय व्याख्यानमाला संपन्न

January 3, 2021

अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान, शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्या : गुलाबराव वाघ !

September 21, 2022

महाराष्ट्राला लसींचे डोस कमी मिळाले; आरोग्यमंत्री राजेश टोपेंचा केंद्र सरकारवर आरोप

January 13, 2021

नाथाभाऊ मजबूत माणूस…तुम्ही कितीही छळ करा, मी झुकणार किंवा घाबरणार नाही !

August 30, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group