पाळधी ता. धरणगाव (प्रतिनिधी) येथून जवळच असलेल्या चांदसर गावात दोन गटात किरकोळ वादातून हाणामारी झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली. या प्रकरणी धरणगाव पोलिसात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
पहिली फिर्याद भाईदास माधवराव शिंदे (वय ४२,व्यवसाय शेती रा. चांदसर) यांनी दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, १) साहिल आयुब पठाण २) अयुब बाबन पठाण (दोघ.रा. चांदसर ता. धरणगाव) हे त्यांना म्हणाले की, तुमची कोळी वाडा भागातील घरामध्ये भरलेली कपाशी खाली करु घ्या, माझ्या आई वडिल यांना कपाशीचे रात्रभर किडे चावतात. त्यामुळे त्यांना रात्रभर झोप येत नाही. तेव्हा मी त्यास म्हणाला की, आम्ही कापाशीला भाव आला की, विकून टाकु असे बोलले. याचा दोघांना राग आल्याने त्यांनी शिवीगाळ करुन चापटाबुक्कांनी मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिली.
तर दुसऱ्या फिर्यादीत साहिल आयुब पठाण यांनी म्हटले आहे की, त्यांनी (१) भाईदास माधवरा शिंदे २) मनोहर शिवदास शिंदे (दोघं रा. चांदसर ता. धरणगाव) यांना म्हटले की, तुम्ही माझ्या घराशेजारी कपाशी भरलेली आहे. कपाशीमध्ये किरकोडे पडलेले आहेत. कपाशीतील किरकोडे हे आई वडिल यांना चावल्याने खाज येत असुन ते रात्रभर झोपू देत नाही, असे बोलण्याचा त्यांना राग आल्याने दोघं संशयित आरोपींना पठाण यांना शिवीगाळ करुन चापटाबुक्कांनी मारहाण करुन आम्ही कपाशी घरातुन काढणार नाही तुला जे कारयचे ते कर अशी धमकी दिली. दरम्यान, दोन्ही गटांनी परस्पर विरोधी दिलेल्या तक्रारींवरून अदखल पात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आला असून दोन्ही गुन्ह्यांचा पुढील तपास पो.हे.काँ. विजय चौधरी हे करीत आहेत.