जळगाव (प्रतिनिधी) कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील काही लोक अधिकारी वर्गाला हाताशी धरून संगनमत करून जाणीव पूर्वकपणे विद्यापीठात भ्रष्टाचार करत आहेत व विद्यापीठाची बदनामी करत आहेत, त्याबाबत चौकशी करण्यात यावी, असे मागणी राष्ट्रवादीचे अँड. कुणाल पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
विद्यापीठाचे कुलगुरू ह्यानी वेळेच्या आधी दबावाला कंटाळून पदाचा राजीनामा का दिला ? विद्यापीठ मधे कर्मचारी यांचे गणवेश काम… बाग काम साफसफाई ठेके, रद्दी साठी टेण्डर न काढता फायद्यासाठी विकलेली रद्दी, सुरक्षा रक्षक ह्यांचे भविष्य पत्रात नमूद केले आहे. विद्यापीठ मधे रोजंदारी कर्मचारी सुरक्षा रक्षक बाग काम करणारे कर्मचारी यांची बिले काढण्यासाठी एका व्यक्तीच्या नावाने केलेले ठराव त्यावर कोणतेही कायदेशीर मत न घेताना ठेकेदाराला पैसे देताना झालेला गैर व्यवहार याची चौकशी व्हावी. विद्यापीठ परिसरात प्रा भटकर यानी विद्यार्थिनी सोबत केलेले संभाषण व तिचा फोन द्वारे केलेला विनय भंग याची तीन वर्ष होऊन देखील चौकशी झाली नाही परंतु त्यात दोन चौकशी अधिकारी यांनी दिलेले राजीनामे याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. विद्यापीठ क्रुती समितीच्या कर्मचारी यांचे काम बंद आंदोलन त्यानी देखील विद्यापीठमधील ऑनलाईन परीक्षा घेतलेल्या बीलच्या चौकशीची मागणी म्हणजेच विद्यार्थी संघटना ह्यांच्या आरोपात असलेले तथ्य झूगारून सुरू असलेला भ्रष्टाचार याबाबत सखोल चौकशी होऊन तात्काळ प्रशासक नेमण्याची मागणी ह्या सर्व मुद्याचा आधार घेत आपण तात्काळ प्रशासक नेमून आमच्या कबचौउमवि विद्यापीठ यास न्याय द्यावा, कारण मागच्या कुलगुरू ह्यांच्या काळात शिल्लक असलेला विद्यापीठ विकास निधी व आता भ्रष्टाचार घोटाळा करून किती निधी शिल्लक आहे. याचा तपशील देखील सर्वाना संकेत स्थळांवर दिसत आहे म्हणून आपणास विनंती की तात्काळ आमच्या विद्यापीठात प्रशासक यांची नियुक्ती करून आमच्या विद्यापीठात वातावरण पूर्व पदावर आणून विद्यार्थी वर्गाचे हित सांभाळून न्याय देवून विद्यापीठ वाचवावे तसेच विद्यापीठात होणारी कर्मचारी आंदोलन ह्याना न्याय द्यावा, अशी मागणी अॅड कुणाल पवार, भूषण भदाणे, गणेश निंबाळकर, गौरव वाणी, चेतन चौधरी यांनी केली आहे.