TheClearNews.Com
Monday, August 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव वाळू माफिया प्रकरण : तक्रारदार झाला आरोपी ; तहसीलदारांची खंडणीची फिर्याद !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 4, 2020
in गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यासह शहरातील अवैध वाळू वाहतूक बंद करावी, या आशयाची तक्रार कॉंग्रेसचे सरचिटणीस रामचंद्र माळी यांनी मंगळवारी केली होती. परंतू तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी तक्रारदार श्री. माळी यांच्याविरुद्धच चक्क खंडणीचा गुन्हा दाखल केल्यामुळे या प्रकरणाला आता नाट्यमय वळण मिळाले आहे.

 

READ ALSO

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

या संदर्भात अधिक असे की, मागील काही दिवसापासून सोशल मीडियात अवैध वाळू वाहतूक आणि वाळू माफियांविरुद्ध कॉंग्रेसचे सरचिटणीस रामचंद्र माळी यांनी सोशल मिडीयाच्या माधमातून आवाज उठविला होता. याच संदर्भात मंगळवारी रामचंद्र माळी ही तक्रार देण्यासाठी तहसीलदार यांच्याकडे गेले. परंतू तहसिलदारांनी अरे तुरेचे भाषा करत त्यांना हाकलून लावल्याचा आरोप श्री. माळी यांनी केला होता. एवढेच नव्हे तर श्री. माळी यांनी यासंदर्भात थेट जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे फोनवरून तहसीलदार यांनी हाकलून लावले व पोलिसांची धमकी दिली, अशी तक्रार केली होती. त्यावर श्री. राऊत यांनी मला तक्रार पाठवा मी कारवाई करायला सांगतो असे आश्वासन दिले. हीच तक्रार श्री. माळी प्रांतधिकारी विनय गोसावी यांना व्हाटसअपला पाठवली. एवढेच नव्हे तर यासंदर्भात पुरावा म्हणून माळी यांनी पत्रकारांना जिल्हाधिकाऱ्यांसोबतच्या चर्चेची ऑडीओ क्लिप, तक्रार पाठविल्याचे स्क्रीन शॉट, प्रांतअधिकाऱ्यांना पाठवलेल्या लेखी तक्रारीचे स्क्रीन शॉट पाठवले. याबाबत त्यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनाही मेलवरून तक्रार केली आहे.

दुसरीकडे आज तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी रामचंद्र माळी यांच्या विरुद्ध दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, तुम्ही मला रेती साठे कुठे-कुठे आहेत ते दाखवा, मी लगेच पंचनामे करतो. परंतु त्यावर काहीतरी पैसे देण्याकरिता ते मला प्रवृत्त करण्यासाठी मुद्दाम तक्रार करायचे म्हणून बोलत होते. तसेच तुमचे काही असेल तर माझेही आर्थिक बघा, असेही ते म्हणाले. वास्तविक त्यांच्या तक्रारीत कोणती तथ्य दिसून येत नाही. केवळ पैशांच्या मागणी करून खंडणी मागणे हीच बाब दिसून आलेली आहे. तसेच रामचंद्र माळी यांच्यावर तहसीलदार यांच्या सोबत असभ्य वर्तन करणे आधारहीन तक्रारी करणे बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध करण्याची धमकी देऊन पैसे देण्याकरिता प्रवृत्त करून खंडणी मागणे इत्यादी बाबत गुन्हा दाखल करण्यात यावा, असे तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

 

अवैद्य वाळू वाहतूकदारांविरुद्ध कडक कारवाई : नितीनकुमार देवरे (तहसिलदार धरणगाव)

 

तक्रारदारला दी. २७ रोजी तुम्ही स्वतः माझ्या सोबत शासकीय वाहनात वाळूचे साठे आहेत, त्या ठिकाणी सोबत चला. मी पंचनामा करतो, असे सांगितले. त्यावर तक्रारदार मी कशाला येऊ?, तुम्ही तुमचे शोधा, असे सांगितले. त्यांच्या तक्रारीत कोणतेही तथ्य नव्हते. आतापर्यंत १९ वाहनांवर अवैद्य वाळू वाहतूकीची कारवाई केली आहे. माझ्यावर वाळू वाहतुकदारांनी हल्ला केला, तरी देखील वाळू माफियाबद्दल कठोर भूमिका घेतली आहे.

—————————

खोट्या गुन्ह्यांना घाबरत नाही : रामचंद्र माळी (कॉंग्रेस, सरचिटणीस)

तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी मला पोलिसांची धमकी दिली, हे मंगळवारीच जिल्हाधिकारी अभिजित राऊत आणि प्रांतधिकारी विनय गोसावी यांच्याकडे तक्रार केली आहे. या तक्रारीबाबतचे पुरावे मी आपल्याला दिले आहेत. माझ्या तक्रारीत तथ्य नव्हते, असे तक्रारीत तहसीलदार यांनी म्हटले आहे. याचाच अर्थ धरणगाव अवैध वाहतूक सुरु नव्हती, असे तहसीलदार साहेबांना म्हणायचे आहे. मग त्यांच्यावर वाळू माफियांनी मध्यरात्री केलेला हल्ला तसेच त्यांनी मागील काही दिवसात साधारण १५-२० वाळू वाहतूकदारांवर कारवाई कशी केली?, असा माझा त्यांना प्रश्न आहे. मी खोट्या गुन्ह्यांना घाबरणारा नाही. माझा लढा सुरूच राहील !

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
गुन्हे

पत्नीसह मुलाकडून डोक्यात हवा मारण्याचा पंप मारल्यानंतर गळा आवळून खून

August 13, 2026
गुन्हे

खाऊसाठी पैशांचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर पाच जणांकडून अत्याचार

August 13, 2026
Next Post

अर्णव गोस्वामीला अटक: कायद्यानुसार कारवाईचे मुस्लिम मंचतर्फे समर्थन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रावेर मतदारसंघातही बारामती सारखी लढत होणार?

March 14, 2024

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते धान्य खरेदीस प्रारंभ !

June 14, 2021

जेडीसीसीची निवडणूक की फसवणूक ? : शिवराम पाटील

October 18, 2021

शरद पवारांना धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल, तर राऊतांना धमकी देणारे दोनजण ताब्यात !

June 9, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group