उखळवाडी ता. धरणगाव (प्रतिनिधी) येथील जय गुरुदेव आश्रमात कृषी विभाग व आत्मा अंतर्गत किमान कौशल्य शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात आला होता.
सदरील कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष स्थानी प्रेमराज पाटील, सभापती पंचायत समिती धरणगाव , शास्त्रज्ञ हेमंत बाहेती, तालुका कृषी अधिकारी किरण देसले, मंडळ कृषी अधिकारी अरुण कोळी, बिएएसएफ कंपनी प्रतिनिधी विवेक पाटील, क्रिस्टल कंपनी प्रतिनिधी चंद्रकांत पाटील, लोटन पाटील, चंद्रशेखर भाटीया, प्रगतशिल शेतकरी, सरपंच गणेश पाटील, ज्ञानेश्वर पाटील, दीपक पाटील, कृषी सहाय्यक गणेश बाविस्कर, चंद्रकांत जाधव, गजानन मोरे, गावाचे तलाठी पवार आप्पा व उखळवाडीतील शेतकरी वर्ग आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन बिटीएम आत्मा दीपक नागपुरे यांनी केले.
प्रशिक्षणा दरम्यान फवारणी करताना घ्यावयाच्या काळजीबाबत बिएएसएफ कंपनी प्रतिनिधी विवेक पाटील यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले व उपस्थित शेतकर्यांना प्रत्यक्ष शेतामध्ये प्रात्यक्षिक देखील करून दाखविण्यात आले. कृषी विज्ञान केंद्र ममुराबाद जि.जळगाव येथील शास्त्रज्ञ हेमंत बाहेती यांनी खरीप हंगामातील पीक व्यवस्थापन कापूस मका या पिकांवरील एकात्मिक कीड रोग व्यवस्थापन या विषयावर उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. आत्मा बी टी एम दीपक नागपुरे यांनी गट निर्मिती व शेतकरी उत्पादक कंपनी या विषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. सदरी कार्यक्रमात उपस्थित शेतकऱ्यांना रानभाजी महोत्सव घेण्यात येऊन रानभाज्यांविषय देखील शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली. कृषि सहाय्यक गणेश बाविस्कर यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.