
जळगाव (प्रतिनिधी) – दोन दिवसांपासून वरुणराजा जोरदारपणे बरसतो आहे. शहर सर्वत्र जलमय असताना तांबापुरा परिसरात अचानक आग लागली. अग्नीतांडवात तीन दुकाने चपाट्यात आली. परिसरातील नागरिकांनी पाणी मारुन आग विझविण्याचा प्रयत्न केला. अग्नीशमन दलाने ही आग विझविली. शुक्रवारीदुपारी ही घटना घडताच. इच्छादेवी चौफुलीपासुन डिमार्टपर्यंत रस्त्यावर गर्दीच गर्दी झाली.
शॉर्टसर्किट होऊन आग लागली असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला. जी.एन. टेलर्स तसेच अण्णा पंचर या दुकानांना अचानक आग लागली. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी धाव घेत पाणी मारत आग विझविण्याचा प्रयत्न केला. खबर मिळाल्यानंतर अग्नीशमन विभागाचा अग्नीबंब सह कर्मचारी घटनास्थळी रवाना झाले. पाण्याचा फवारा मारुन आग विझविण्याच्या कामाला सुरुवात केली. तांबापुर आणि परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतल्याने इच्छादेवी शिरसोली रस्त्यावर गर्दीच गर्दी झाली होती. रस्त्यावर लांबपर्यंत वाहनांच्या रांगा लागुन वाहन विस्कळीत झाली होती. आमदार सुरेश भोळे तसेच मनपा आयुक्त आदित्य जीवने यांनी घटनास्थळी भेट देत आगीच्या घटनेची माहिती घेतली.
















