TheClearNews.Com
Thursday, June 12, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मधुमेहाच्या भीतीने तुम्हीही गोडं खाणं पूर्णपणे बंद केलंय का?, तर ही माहिती जाणून घ्या…!

The Clear News Desk by The Clear News Desk
October 12, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) धावपळीचे आयुष्य, बदलती जीवनशैली, अनुवांशिकता यामुळे मधुमेह होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे अनेकजण पहिल्यांदा गोड खाणं म्हणजेच साखर सोडतात. पण हे सगळं करणं खरंच फायद्याचं ठरतं? साखर पूर्णपणे सोडल्यामुळे आपल्याला फायदा होतो की नुकसान?, तर मित्रहो, साखर पूर्णपणे बंद केल्याने शरीरावर काय परिणाम दिसून येतो हे तुम्हाला माहीत आहे का?, चला जाणून घेऊया.

एक व्यक्ती वर्षाला २८ किलो साखर फस्त करते

READ ALSO

“आमदार मंगेश चव्हाण यांनी राबविलेली रायगड मोहीम हे युवापिढीला शिवसंस्कार देणारे अद्वितीय कार्य ” – उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे

नोकरीचा बहाणा ; दीड कोटीचा चुना !

अमेरिकेमध्ये करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात असं समोर आलं होतं, की साधारणपणे एक व्यक्ती वर्षाला २८ किलो साखर फस्त करते. एवढ्या मोठ्या प्रमाणात साखर खाणं हे शरीरासाठी नक्कीच घातक आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या निर्देशांनुसार, एका व्यक्तीने दिवसाला जास्तीत जास्त पाच ते सहा चमचे, किंवा २५-३० ग्रॅम साखर खायला हवी. याहून अधिक साखर खाणं आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं. तर दुसरीकडे अमेरिकन हार्ट असोसिएशनने म्हटलं आहे, की पुरुषांनी एका दिवसात साधारणपणे १५० कॅलरीज आणि महिलांनी १०० कॅलरीपर्यंत साखरेचं सेवन करावं. पुरुषांच्या तुलनेत महिलांनी कमी साखर खावी असं या संस्थेचं म्हणणं आहे. पण मग कमीत कमी ५-६ चमच्याऐवजी जर पूर्णपणेच साखर बंद केली तर?

साखरेचा वापर केलेले गोड पदार्थ सोडणं हे आरोग्यासाठी फायदेशीरच ठरू शकतं

साखरेचा वापर केलेले गोड पदार्थ पूर्णपणे सोडणं हे आरोग्यासाठी फायदेशीरच ठरू शकतं. केवळ महिनाभर साखर खाणं वा वापरणं सोडल्यामुळे, तुम्हाला पहिल्यापेक्षा जास्त एनर्जेटिक वाटू लागेल. यामुळे तुमची चिडचिडही नाहीशी होईल, तसंच वेळोवेळी जाणवणारा थकवाही कमी होऊ शकतो. एवढे सगळे फायदे पाहून तुम्ही विचार करत असाल, की आता साखर बंद करू तर थोडं थांबा. एकदमच साखर खाणं सोडणंही तुमच्या शरीराला घातक ठरू शकतं.

तुम्ही जर पहिल्यापासून नियमित साखर खात असाल, तर तुमच्या शरीराला त्याची सवय झालेली असते. एकदमच साखर खाणं सोडल्यामुळे तुम्हाला अचानक थकवा जाणवू शकतो. असं होऊ नये यासाठी तुम्हाला टप्प्याटप्प्याने साखर खाणं कमी करावं लागेल. म्हणजे, तुम्ही जर चहामध्ये दोन चमचे साखर घेता; तर ते कमी करून एक चमचा, अर्धा चमचा आणि मग शेवटी बंद अशा टप्प्यांमध्ये तुम्हाला साखर कमी करावी लागेल.

फळं, ड्रायफ्रूट्स असे गोड पदार्थ खाणं गरजेचं

आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. तुम्ही साखर पूर्णपणे बंद करणं तुमच्या आरोग्यासाठी फायद्याचं असलं तरी फळं, ड्रायफ्रूट्स असे गोड पदार्थ खाणं गरजेचं आहे. पूर्णपणे गोड पदार्थ सोडणं तुमच्यासाठी घातक ठरू शकतं. यामुळे तुमच्या बॉडी फॅटपासून ग्लुकोज बनवण्यासाठी आवश्यक घटक कमी पडतात. त्यामुळे शरीर कीटोन्सची निर्मिती सुरू करते. हे कीटोन्स तुमची चरबी जाळतात, मात्र अशा प्रकारे फॅट कमी केल्यास तुमच्या मसल्समध्ये दुखण्यास सुरूवात होते. एकंदरीत, साखर सोडल्यामुळे तुम्हाला फायदाच आहे. पण पूर्णपणे गोड पदार्थ सोडल्यामुळे तुमचं नुकसानच होऊ शकतं.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

“आमदार मंगेश चव्हाण यांनी राबविलेली रायगड मोहीम हे युवापिढीला शिवसंस्कार देणारे अद्वितीय कार्य ” – उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे

June 11, 2025
गुन्हे

नोकरीचा बहाणा ; दीड कोटीचा चुना !

May 31, 2025
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
जळगाव

जलसंधारणासाठी कटीबद्ध राहूया- पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन

March 21, 2025
जिल्हा प्रशासन

राज्यातील बसस्थानक अत्याधुनिक सेवा सुविधायुक्त करणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

March 18, 2025
राजकीय

विधान परिषदेत प्रकल्पग्रस्तांच्या नोकरभरतीचा मुद्दा गाजला – आ. एकनाथ खडसेंनी सरकारला धोरण बदलण्याची मागणी केली

March 11, 2025
Next Post

महाराष्ट्रात लोडशेडिंग करणार नाही : ऊर्जामंत्री नितीन राऊत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Horoscope Today : आजचं राशिभविष्य, 25 मे 2024 !

May 25, 2024

लक्षात ठेवा धीरुभाई अंबानीही पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायचे, मुख्यमंत्री रिक्षा चालवायचे हा इतिहास आहे, पण..!

July 4, 2022

जळगावात जयश्री महाजन निश्चितच घडवणार इतिहास ; समर्थकांचे विश्वासदर्शक उद्गार

November 11, 2024

१७ वर्षीय तरुणीवर आळीपाळीने सामूहिक बलात्कार ; ७ आरोपींना अटक !

January 30, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group