सिरोही (वृत्तसंस्था) गुजरात (Gujarat) येथे हनिमूनसाठी (Honeymoon) एक दाम्पत्य गेले होते. पण याठिकाणी पत्नीची हत्या झाल्याचे समोर आले आहे. लग्नाला अवघे २८ दिवसच झाले होते. हत्या केल्यानंतर पतीने तिची प्रकृती अस्वस्थ झाली होती अन् त्यातच तिचा मृत्यू झालाचा कुटुंबियांसमोर बनावही रचला. मात्र पोस्टमार्टमध्ये पितचं पितळ उघडं पडलं. त्यानेच तिची हत्या केल्याचे समोर आलं.
माउंट अबू पोलिस स्टेशनचे सीओ योगेश शर्मा यांनी सांगितलं की, ३२ वर्षीय मुलगा जॉली कुमार, रा. खतलवाडा, वलसाड (गुजरात) हा त्याची पत्नी रुचिका (२८) सोबत १० जानेवारी रोजी माउंट अबूला हनिमूनसाठी आले होते. गुजरात तोरणा भवन येथे त्यांचा मुक्काम होता. १० जानेवारी रोजी अचानक रुचिकाची तब्येत बिघडली. उलट्या झाल्यानंतर तिला ग्लोबल हॉस्पिटलमध्ये नेले. उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेलं असता डॉक्टरांनी रुचिकाला मृत घोषित केले. डॉ.नवीन शर्मा, तनवीर हुसेन आणि कुसुम लता अग्रवाल यांनी रुचिकाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.
शासकीय हॉस्पिटलमधील डॉ नवीन यांनी सांगितलं की, रुचिकाच्या मृत्यूनंतर १ महिना आणि ३ दिवसांनी पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला आहे. महिलेचे सर्व अवयव बरोबर असल्याचे अहवालात आले आहे. महिलेचा पातळ फांदीने गळा आवळून खून करण्यात आला. रुचिकाच्या घशापासून तोंडापर्यंत अनेक पाने भरली होती, त्यामुळे तिला श्वास घेता येत नव्हता. महिलेच्या गळ्यात सुमारे मूठभर पाने भरलेली आढळून आली. रुचिकाचा प्रथम एका पातळ फांदीने गळा दाबण्यात आला. त्यानंतर तिचं तोंड जाड उशीनं किंवा इतर कोणत्याही वस्तूनं दाबण्यात आलं त्यानंतर हाताने गळा आवळूनही खून करण्यात आला आहे.
२८ दिवसांपूर्वीच लग्न झाले होते
पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर रुचिकाचे वडील हरीश भाई रहिवासी वलसाड गुजरात यांनी गुरुवारी माउंट अबू पोलीस ठाण्यात रुचिताचा पती जॉली कुमारविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. हरीशने पोलिसांना सांगितले की, रुचिकाचे गुजरातमध्ये १३ डिसेंबर २०२१ रोजी जॉलीसोबत लग्न झाले होते. लग्नाच्या २४ दिवसांनंतर हे जोडपे गुजरातमधून माउंट अबूला हनिमूनसाठी निघाले होते. अंबाजीचं दर्शन घेतल्यानंतर ७ जानेवारीला त्यांनी हॉटेलमध्ये मुक्काम केला. यानंतर ९ जानेवारीला फोन करून जॉलीने रुचिकाची तब्येत अचानक बिघडली आणि रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाल्याची माहिती दिली होती.