खोपोली (वृत्तसंस्था) मुंबई पुणे एक्स्प्रेसवर झालेल्या एका भीषण अपघातात 5 जण ठार झाले आहेत. तर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. इरटीका कारने एका वाहनाला मागून धडक दिल्याने हा भयानक अपघात झाला असल्याचं समोर येत आहे. या गाडीत एकूण 7 लोक होते. यातील 5 जणांचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितनुसार मुंबईचा दिशेने येत असलेल्या इरटिका मच्छिंद्र आबोरे (वय ३८ रा. पिंपरी चिंचवड) हे चालवित होते. रात्री पावणे बाराच्या मुंबईपासून अलीकडे बोरघाटात ढेकू गावचे हद्दीत एका अज्ञात वाहनाने धडक दिली. ही धडक इतकी वेगात होती की गाडीतील रस्त्यात गाडी रस्त्याच्या कडेला जाऊन पडली. आतील प्रवासी दरवाजा तुटल्याने बाहेर पडले. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने काही जणांचा तेथेच मृत्यू झाला. कारमधील हे सर्व प्रवासी हे अर्टिगा ह्या चारचाकी वाहनामधून वेगवेगळ्या ठिकाणाहून मुंबईकडे जाण्यासाठी निघाले होते. काही वेळातच महामार्गावरील आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मदतकार्य सुरू केलं. जखमींना रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र, रस्त्यातच आणखी एकाचा मृत्यू झाला. सध्या दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे :
१) अब्दुल रहमान खान,३२ वर्षे, घाटकोपर २) अनिल सुनिल सानप, ३) वसीम साजिद काझी, रा.राजापूर, जि. रत्नागिरी ४) राहुल कुमार पांडे, वय-३० वर्षे, फ्लॅट न.-६०५, रिद्धेश्वर हौ. सो., कामोठे. नवी मुंबई ५) आशुतोष नवनाथ गांडेकर, २३ वर्षे, ५, अशोक धर्मा चाळ, म्हातारपाडा, अंबोली, अंधेरी(प), मुंबई
अपघातातील जखमींची नावे :
१) मच्छिंद्र आंबोरे वय ३८ वर्ष(चालक) २) अमीरउल्ला चौधरी ३) दिपक खैराल
किरकोळ जखमीः-
१) अस्फीया रईस चौधरी, २५ वर्षे. कुर्ला, मुंबई