TheClearNews.Com
Wednesday, June 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मनसैनिकांना अडकवण्यासाठीच वातावरण पेटवले, अन्यथा एका खासदाराची हिम्मत काय?

जाणून घ्या...अयोध्या दौरा, औरंगजेब ते अफजलखानाची कबर, राज ठाकरेंच्या सभेतील महत्त्वाचे मुद्दे !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 22, 2022
in राजकीय, राज्य
0
Raj Thackeray. (File Photo: IANS)

Raj Thackeray. (File Photo: IANS)

Share on FacebookShare on Twitter

पुणे (वृत्तसंस्था) अयोध्या दौऱ्याला विरोध असतानाही मी तिकडे गेलो असतो आणि काही झाले असते तर मनसैनिकही तिकडे भिडले असते. त्यानंतर त्यांना केसेसमध्ये अडकवण्याचा ट्रॅप होता. मी माझे मनसैनिक असे हकनाक अडकू देणार नाही. तसेच ज्यांना ज्यांना माझी अयोध्या वारी खुपली होती असे अनेक जण होते. त्या सर्वांनी मिळून हा ट्रॅप आखला असं राज ठाकरेंनी जाहीर सभेत सांगितलं.

 

READ ALSO

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

राज ठाकरे पुढे म्हणाले की, मी एकाच गोष्टीचा विचार केला. अयोध्येला जाणार हा विचार मनात होतो. राम जन्मभूमीचं दर्शन घेणं आलं. मी हट्टाने गेलो असतो. महाराष्ट्रातील सैनिक हिंदू बांधव आले असते. तिथे जर काही झालं असतं. आपली पोरं तर गेली असती अंगावर, तुमच्यावर केसेस टाकल्या गेल्या असत्या. तुम्हाला तुरुंगात सडवलं गेलं असतं. हकनाक कारण नसताना केसेसचा ससेमिरा लावला असता. मी बाळा नांदगावकर आणि सरदेसाईंना सांगितलं आपल्या पोरांना हकनाक घालवणार नाही. सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांवर केसेस टाकल्या असत्या. ऐन निवडणुकीच्यावेळी हे झालं असतं. तेव्हा इथे कोणीच नसतं हा सर्व ट्रॅप होता.

 

एक खासदार उठतो आणि मुख्यमंत्र्यांना आव्हान देतो. शक्य आहे का ? या गोष्टींना अनेक पापुद्रे आहेत. काही तर तुम्हाला सांगता येणार नाही. मी माफी मागावी याची मागणी केली, यांना आता 12-14 वर्षांनंतर जाग आली. यातून चुकीचे पायंडे पडत आहेत. विषय माफी मागण्याचाच आहे ना मग गुजरातमध्ये अल्पेश ठाकूर नावाच्या नेत्यांनं यूपी,बिहारच्या लोकांना हाकलून दिलं. ती लोकं मुंबईत आले, इथं आओ जाओ घर तुम्हारा. तिथं गुजरातमध्ये कोण माफी मागणार, असं राज ठाकरे म्हणाले. हे राजकारण समजून घेणं गरजेचं आहे. यांना आपलं हिंदूत्व झोंबलं, लाऊडस्पिकर झोंबले, असं राज ठाकरे म्हणाले.

 

गुजरातमध्ये अल्पेश ठाकूर म्हणून गृहस्थ आहेत. तिथं उत्तर प्रदेश आणि बिहारच्या लोकांपैकी एकानं बलात्कार केला. यानंतर उत्तर प्रदेश आणि बिहारच्या लोकांना बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर ते मध्यप्रदेशमध्ये गेले त्यानंतर तिथं त्यांना मारहाण करण्यात आली. यानंतर ते महाराष्ट्रात आले, असं राज ठाकरे म्हणाले. जर मशिदीवर बांग जोरात लागली तर हनुमान चालिसा जोरात लावा, असं मी सांगितलं. राणा दाम्पत्य उठलं आणि मातोश्रीवर हनुमान चालिसा म्हणणार असं सांगितलं, त्यानंतर त्यांना अटक झाली. मधू इथे आणि चंद्र तिथे, असं झालं. त्यानंतर त्यांना सोडण्यात आलं. शिवसैनिक आक्रमक झाले. लडाखमध्ये संजय राऊत आणि राणा दाम्पत्य जेवतानाचे फोटो समोर आली. यांचं हिंदुत्त्व ढोंगी आहे, असं राज ठाकरे म्हणाले.

 

भाषणाच्या सुरुवातीला राज यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव घेता टोला लगावला. निवडणुका नाही तर उगाच भिजून का भाषण करायचं? सध्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. म्हणून नदी पात्रातील सभा रद्द केली. यावेळी उपस्थित कार्यकर्ते म्हणाले, आवाज… आवाज. यावर राज म्हणाले, आवाज ! हळूहळू येईल. मी अयोध्या दौरा रद्द केला आहे. त्याचे कारण मी आधीच सांगितले आहे. माझ्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. पायाचे दुखणे वाढले आहे. त्यामुळे मी माझा अयोध्या दौरा स्थगित केला,असे राज यांनी सांगितले.

 

राणा दाम्पत्यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, ते मातोश्रीवर हनुमान चालिसा म्हणायला जाणार होते. मातोश्री काय मशीद आहे काय? असा सवाल त्यांनी केला. मोठा गोंधळ, आरोप प्रत्यारोप झाले. एवढा गोंधळ होऊन संजय राऊत आणि राणा दाम्पत्य लडाखमध्ये एकत्र जेवताना दिसले. हे सगळे ढोंगी आहेत, असं राज ठाकरे म्हणाले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
जळगाव

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप! सभापती सुनिल महाजनांविरुद्ध १३ संचालकांचा अविश्वास प्रस्ताव

April 28, 2026
Next Post

अमळनेर : दारुड्या नवऱ्याच्या जाचाला कंटाळली, दोन मुलांसह महिला आत्महत्या करायला निघाली ;११२ मुळे वाचले प्राण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today Horoscope : आजचं राशिभविष्य, 23 मार्च 2024 !

March 23, 2024

धरणगावात ‘ओबीसी आरक्षण बचाव’ समितीची बैठक ; शुक्रवारी महामेळाव्याचे आयोजन !

October 17, 2023

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 27 ऑगस्ट 2025 !

August 27, 2025

धक्कादायक : पोलिसाकडूनच तक्रारदार महिलेचा विनयभंग, फोनवरून अश्लिल संवाद !

October 28, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group