TheClearNews.Com
Monday, June 9, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

“जय भीम” चित्रपट नव्हे, राज्यघटनेबद्दल आस्था निर्माण करणारी चळवळ !

वाचा प्रा.बी.एन. चौधरी यांचा विशेष लेख

The Clear News Desk by The Clear News Desk
April 13, 2022
in धरणगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रा.बी.एन.चौधरी) चित्रपट उद्योग हा देशात बऱ्यापैकी स्थिरावला असला तरी, भारतीय चित्रपटाने मनोरंजन हाच मुख्य उद्देश मानलेला दिसतो. चित्रपटातून मनोरंजन करणे आणि दर्शकांना आपल्या दुःखांना विसरायला लावणे, येवढाच मर्यादीत अर्थ, मुख्य प्रवाहात दिसून येतो. त्यातल्या हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये काही मोजकी चित्रपटं सोडली, तर ती आभासी, भ्रामक मनोरंजनाच्या वर्तुळाबाहेर यायलाच तयार नाहीत. हीच सध्याची परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर नुकताच जय भीम हा चित्रपट माझ्या पाहण्यात आला. त्याने चित्रपटांबाबतच्या माझ्या सार्‍या धारणा, कल्पना बदलून टाकल्या. चित्रपट हे मनोरंजनाचे मुख्य साधन असले, तरी त्यातून प्रबोधनाचा आशादीप सदैव तेवत राहिला पाहिजे असं मला वाटून गेलं. ती भूमिका घेऊन जय-भीम उभा आहे, असं मला वाटतं. जय भीम हा केवळ एक चित्रपट रहात नाही, तर राज्यघटनेबद्दल आस्था निर्माण करणारी चळवळ म्हणून तो डोळ्यात भरतो.

जय भीम चित्रपट, केवळ चित्रपट न राहता, ती एक चळवळ बनली असून, त्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांनी लिहिलेली घटना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ज्या समाजामध्ये जय-भीम म्हणणं, हे एका विशिष्ट वर्गाच्या अभिवादना पुरतेच मर्यादीत आणि बहुजनांकडून साशंकतेने पाहण्याइतकं तटस्थ झालेलं असताना, या चित्रपटाने देशभरातून जय भीम या नाऱ्याला प्रतिष्ठा मिळवून दिली आहे. हजारो वर्षापासून देशात सुरू असलेली जातीयता आणि तीचं जात वास्तव सर्वांना परिचित झालेलं आहे. त्यातील जातिभेद, अस्पृश्यता, अन्याय, अत्याचार, संघर्ष आणि न्यायाची होणारी सातत्याची पायमल्ली यामुळे अनेक पिढ्या पिचून निघाल्या आहेत. यावर हा चित्रपट प्रखर भाष्य करतो. म्हणून तो जनसामान्यांचा आवडता चित्रपट ठरला आहे. तमिळ भाषेतील या चित्रपटाने भाषेची मर्यादा ओलांडून, चित्रपटाचा मुख्य उद्देश, राज्यघटने बद्दल आस्था निर्माण करणे, याला देशातच नव्हे, तर परदेशातही प्रखरपणे साध्य केले आहे.

READ ALSO

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त धरणगाव नगरपरिषदेतर्फे वृक्षारोपण व प्लॅस्टिक बंदीबाबत कारवाई !

शिवसेनेच्या चार नवीन उपनेत्यांची घोषणा

तामिळनाडू राज्यातील तिरुचिरापल्ली जिल्ह्यातील इरुला या आदिवासी जमाती बद्दल हा चित्रपट भाष्य करतो. चित्रपटातील पटकथा एका सत्य घटनेवर बेतलेली असून, १९९५ मध्ये एका न केलेल्या गुन्ह्यातील आरोपीचा पोलीस स्टेशन मध्ये झालेल्या मृत्यू बद्दल, मद्रास हायकोर्टाने दिलेल्या निकालावर हा चित्रपट आधारित आहे. तामिळनाडूमध्ये इरुला नावाची एक आदिवासी जमात असून, ती जंगलातील साप पकडण्याचे काम करते. अत्यल्प असलेला हा समाज अशिक्षित, असंघटीत असून रानावनात राहुन, संघर्ष करत आपली उपजीविका चालवतो. चित्रपटातील राजकन्नू आणि त्याची पत्नी सिंगणी साप पकडणे, शेती काम करणे असं आपला उदरनिर्वाह करत असतात. एके दिवशी राजकन्नू याला एका सावकाराकडे साप पकडण्यासाठी बोलवतात आणि त्या सावकाराकडे दागिन्यांची चोरी होते. या चोरीचा आरोप राजकन्नूवर ठेवण्यात येतो. त्याला अटक केली जाते. आपण कोणताही गुन्हा केलेला नाही, असं जीवाच्या आकांताने सांगूनही, त्याच्या खुलाशावर कोणीही लक्ष देत नाही. उच्चपदस्थांशी असलेल्या लागेबांधामुळे, सावकाराकडे झालेल्या चोरीचा तपास लावण्याच्या उद्देशाने, कुणालाही बळीचा बकरा करून पोलीस केस निकाली लावण्याचा प्रयत्न करतात. मात्र, राजकन्नू गुन्हा स्वीकारत नाही. या कामी त्याची पत्नी सिंगणी निर्धाराने त्याच्या पाठीशी उभी राहते. त्याला साथ देते. गावातील काही चळवळीतील कार्यकर्ते त्यांना वकील चंद्रू पर्यंत पोहोचवतात. इथं चित्रपटाचा नायक सूर्या चंद्रू म्हणून समोर येतो आणि कथा वेग घेते. चंद्रू हा अनाथ, अबला, आदिवासी, दिन दलितांच्या मानवाधिकार प्रकरणांमध्ये लक्ष घालणारा वकील असतो. मिळेल ती फी घेऊन, प्रसंगी मोफतही वकिली करणारा, ध्येयनिष्ठ वकील म्हणून चंद्राची प्रतिमा समोर येते. तो या प्रकरणात लक्ष घालतो आणि कथा खुलत जाते. पकड घेते.

चंद्रू जसा याप्रकरणातील पदर उलगडत जातो आणि घटनेतील प्रसंग तपासतो, तेव्हा त्याला या घटनेमागे असलेले घृणास्पद, विदारक सत्य समोर येते. तो या प्रकरणाचा छडा लावण्याचा मनात ठरवतो. आणि, शेवटी तळ गाठतो. यातून पोलिसांची निष्ठूरता, क्रूरता, निर्ढावलेपण, पैशावाल्यांचे बटीक झाल्याची वृत्ती, हिंसाचार, समाजातला भेदभाव, राजकारण्यांची निर्ढावलेली वृत्ती आणि दिन, दलितांवर होणारा अत्याचार याचं दर्शन चित्रपटातील प्रत्येक फ्रेम मधून होतं. ते प्रत्यक्ष चित्रपटातच बघायला हवं, इतक्या दमदारपणे दिग्दर्शकाने आणि कला दिग्दर्शकाने ते साकारलेलं आहे. कला दिग्दर्शकाचं याठिकाणी विशेष अभिनंदन केले पाहिजे ! ते यासाठी, की त्याने उभं केलेलं चित्रपटातील ९० चे दशक, हे दर्शकाला थेट भूतकाळात घेऊन जातं. जगण्याच्या वास्तवामधून फिरवून आणतं. चित्रपट बघणार्‍याला, प्रसंगातील क्रूरता आणि हिंसाचार बघून प्रचंड त्रास होतो. इतका की, काहीवेळा प्रेक्षक डोळे बंद करून बसतो. वास्तवाला जसंच्यातसं उभं करण्यात, दिग्दर्शक यशस्वी झाला आहे याची ही पावती आहे. हे कटू वास्तव, चित्रपटांमधून बघतांना आपल्याला खूप त्रास होतो. तर, ते ज्यांनी प्रत्यक्ष भोगलेले असेल, त्यांनी किती यातना भोगल्या असतील ? किती आणि काय, काय सहन केलं असेल ? याची कल्पनाही करवत नाही.

चित्रपटाचा मुख्य नायक सूर्या म्हणजे वकील चंद्रू असला, तरी चित्रपटभर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवते ती, राज कन्नूची पत्नी सिंगणी. ही भूमिका लिव मॉल जोरने इतकी प्रभावी साकारली आहे की, चित्रपटगृहात बसलेला प्रेक्षक थेट तिच्याशी जुळून जातो. ती आपल्या कुटुंबातील सदस्य आहे, अशी भावना दर्शकांमध्ये निर्माण होते. तिने आपल्या पतीला दिलेली समर्थ साथ, त्याच्यासोबत अन्याया विरुध्द लढण्याचा केलेला निर्धार आणि हाती पैसा नसतानाही सत्यासाठी केलेला सत्याग्रह, यातून अतिशय सामान्य वाटणारी संगिनी, ही एक धीरोदात्त विचारांनी भारलेली आणि स्वयम् तेजाने उजळून निघणारी विद्युल्लता बनून संपूर्ण चित्रपट वावरते. तिला साथ देणारा वकील चंद्रू हा प्रेक्षकांच्या मनाचा नायक कधी बनतो, ते कळतच नाही. प्रेक्षक त्याच्या रूपात स्वतःला बघायला लागतो. त्याला असं वाटायला लागतं की, जे चंद्रू वकील करतोय, ते आपण कां करु शकलो नाही.? आता तरी पुढे आपण हे करणार कां.? आपण हे करायलाच हवं.! हे प्रश्न घेवून तो बाहेर पडतो. हे या चित्रपटाचे यश आहे

पोलीस श्रीमंतांना, राजकारण्यांना उद्योजकांना वचकून असतात. प्रसंगी त्यांच्यापुढे लोटांगण घालतात. लाचारी पत्करतात. कायद्याला पाहिजे तसं वागवतात. परंतु, दलित,शोषित ,पीडित यांच्यासमोर मात्र ,ते आपली मर्दुमकी दाखवतात. आपल्या अधिकाराचा गमजा मिरवतात. अधिकार आपल्याला पाहिजे तसं वापरतात. त्यासाठी, कायद्याला ही बदलू पाहतात. याचं प्रभावी चित्रण संपूर्ण चित्रपटभर आपला पाठलाग करतं. पोलीस आदिवासींचा जो छळ करतात, तो इतका वास्तव चितारला गेला आहे, की प्रेक्षक त्यात समरस होतो. दातामध्ये नखं कुरतडायला लागतो. दात-ओठ खातो. प्रसंगी शिव्याही देतो. व्यवस्थेबद्दलची ती त्याची चिड असते. तो आदिवासीपैकीच एक होऊन जातो. यातून दिग्दर्शकाने केलेली मेहनत आपल्यासमोर येते. या चित्रपटात मनोरंजन शोधूनही सापडत नाही. जे सापडतं ते मानवतेला अमृत देणारं आहे, संजीवनी देणारं आहे. माणसाला माणूस बनवणार आहे. अशी भावना निर्माण होते. वकील चंद्रू जेव्हा जेव्हा न्यायालयात राजकन्नूची बाजू मांडतो, तेव्हा तेव्हा घटनेत किती बारीक-सारीक कायदे केलेले आहेत, कलमं बनवलेली आहेत, याची प्रचिती येवून प्रेक्षक मंत्रमुग्ध होतो. अचंबित होतो आणि त्यांचं मन घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रती श्रद्धेने कृतकृत्य होते. एक विनम्र भाव, प्रत्येकाच्या मनात निर्माण होतो .त्यांच्याबद्दलचा अभिमान दुणावतो. एखाद्या चळवळीला देखील जी गोष्ट शक्य नव्हती, ती एका प्रादेशिक चित्रपटाने साध्य करून दाखवली, हेच या चित्रपटाचे यश आहे. शासकीय नोकरीमध्ये अथवा राजकारणामध्ये किंवा समाजात देखील, सर्वत्र वाईट निराशाजनकच आहे, असं नाही. या प्रत्येक ठिकाणी चांगली माणसे देखील भेटतात. जी आशेचा किरण असतात. जे सकारात्मकता जिवंत ठेवण्याचे काम करत असतात. या चित्रपटात आईजी पेरूमल स्वामी हा असाच एक मिणमिणणारा आशादीप भेटतो. जो जगण्याचं बळ देतो. ही भुमिका प्रकाश राज यांनी अतिशय दमदारपणे साकारलेली आहे.

जय-भीम या नावामुळे संपूर्ण चित्रपट हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अवतीभवती फिरत असेल अशी कल्पना प्रत्येकाला वाटणे स्वाभाविक आहे. हा चित्रपट दलित समाजाचा उद्धार करण्यावर भाष्य करत असावा, असाही गैरसमज होऊ शकतो. परंतु, संपूर्ण चित्रपटात एकदाही जय भीम हा नारा उच्चारला जात नाही. तरीही, चित्रपटगृहाबाहेर पडणारा प्रत्येक दर्शक जय-भीम म्हटल्याशिवाय बाहेर येऊ शकत नाही. ही याची खासियत ठरली आहे. हा संदेश इतक्या प्रभावीपणे चित्रपट घेतलेला आहे, की दलित हा शब्द न उच्चारताही, दलितांच्या जीवनातलं कटू वास्तव, आजच्या पिढीतील सुखवस्तू, मध्यमवर्गीय, उच्चवर्णीय लोकांपर्यंत पोहोचवण्यात, बिंबविण्यात दिग्दर्शक ज्ञानवेल यशस्वी झालेले आहेत. एखादा मुरलेला दिग्दर्शक, एखाद्या संवेदनशील विषयाला किती प्रभावीपणे मांडू शकतो, याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे जय भीम चा चित्रपट आहे.

जय-भीम म्हटलं तर तो अभिवादन करण्याचा एक संबोधन आहे. दलित बांधव एकमेकांना भेटताना, एकमेकांना जय-भीम करतात. हा त्यांचा आत्मसन्मानाचा एक उदघोष आहे. परंतु, हाच उद्घोष समाजामध्ये त्यांच्याप्रती गैरसमज निर्माण होण्याचे कारण देखील बनला आहे. जय-भीम म्हणणं म्हणजे दलित, मागासवर्गीय असणं असा समज सर्वत्र रुढ झाला आहे. ती जात व्यवस्थेची खूणगाठ झालेली आहे. चार चौघात कोणी जय-भीम म्हटलं, तर बघणारे कान टवकारून, त्याच्याकडे बघतात. त्यांच्या नजरेत एक तुसडेपणाची भावना दाटून येते. तिची सवय दलित बांधवांनाही झालेली आहे. जाणवलेली आहे. म्हणून दलितांनमधून जे शिकून, नोकरी मिळवून ,वरच्या पदांवर गेले आहेत, पुढारलेले आहेत ते जय भिम म्हणायला टाळाटाळ करू लागले आहेत. हेही एक कटु वास्तव आहे. याला काही सन्माननीय अपवाद आहेत. खरंतर जय भीम एक प्रतीक आहे. ओळख आहे एका संस्कृतीची, एका क्रांतीची, एका चळवळीची, एका न्यायाधिकाराची. ती पुन्हा एकदा नव्याने प्रस्थापित करण्याचे काम, या चित्रपटाने केले आहे. त्यासाठी दिग्दर्शक आणि कलावंताचे योगदान मान्यच करायला हवे.

अशाप्रकारचे संवेदनशील विषय हाताळण्यात हिंदी चित्रपटांनाही फारसे यश आलेले नाही. काला ,असुरण, कर्णान, विसरणाई, आरक्षण, जयभीम आणि झुंड ही इतर भाषेतून हिंदीत आलेली चित्रपट अपवाद ठरले आहेत. मराठी चित्रपट गावगाड्यातील पाटील, कौटुंबिक कलह आणि बाष्कळ विनोद या पलीकडे गेलेले नाहीत. मात्र, जय भीम या सर्वांच्या पुढे जात, आपलं वेगळेपण ठसवून गेला. यातील प्रत्येक फ्रेम बोलकी करताना दिग्दर्शकांने आणि कला दिग्दर्शकाने घेतलेली जीवतोड मेहनत जाणवत राहते.

चित्रपटाची सुरुवात होतानाच सावकाराचा माणूस जेव्हा कनुला बोलवायला येतो, मोटरसायकलवर बसवून घेऊन जातो, तेव्हा कनू त्याच्या खांद्यावर हात ठेवतो. त्याने खांद्यावर हात ठेवताच तो नौकर ज्या कुत्सित नजरेने त्याच्याकडे बघतो, त्याने कनू घायाळ होऊन, आपला हात त्याच्या पाठीवरून खाली घेतो. या फ्रेममधून दिग्दर्शक उच्चनीचता, अस्पृश्यता, भेदाभेद क्षणात दर्शकांच्या मनावर बिंबवतो. पोलीस स्थानकात निरपराध कनूला गुन्हा स्वीकारण्यास भाग पाडण्यासाठी ज्या बेशरमपणे, अमानुषपणे पिटण्यात येतं, त्यातून पोलिसांचे निर्ढावलेपण दाखवण्यात दिग्दर्शक यशस्वी होतो. वकील चंद्रू आणि आईजी जेव्हा एकमेकांना भेटतात, तेव्हा आयजी कारमध्ये आणि चंदू बाहेर असतो. त्या दोघांच्या मध्ये खिडकी असते. यातून ते समविचारी असले तरी, मधे एक पडदा आहे, असं दिग्दर्शक दाखवतो. पुढे वकिल आणि आईजी यांचे विचार एकमेकांशी जुळतात, तेव्हा ते दोघे एकमेकांच्या सोबत एकाच कारमध्ये एकमेकांजवळ बसलेले दाखवतात. याचा अर्थ सत्य समोर आल्यानंतर भेदभाव, भेदाभेद, अस्पृश्यता सारे दूर होतात, याची प्रचिती या दृश्यातून येते. पोलिसांचा कृष्णकृत्य बाहेर येतं आणि खरे गुन्हेगार पोलिसच आहेत हे उघड होतं. तेव्हा, पोलिसांची नाचक्की थांबवण्यासाठी आई जी सेंगणीला पैशांचं आमिश देतात. तेव्हा, ती ज्या निर्धाराने पैशाला लाथाडते आणि सत्याचा आग्रह धरते, त्यातून दिग्दर्शक शेवटी सत्याचाच विजय होतो, हे मांडण्यात यशस्वी होतो. त्याच वेळेस, संघर्षाशिवाय सत्य मिळू शकत नाही आणि ते मिळवण्यासाठी पैसा नव्हे तर निर्धार आवश्यक असतो, याची शिकवणी दिग्दर्शक समाजाला अप्रत्यपणे देतो.

चित्रपटाचा शेवटी सत्याचा विजय होतो. गुन्हेगारांना शिक्षा होते. सेगिनीचा पती मेलेला असतो. परंतु तिला न्याय मिळतो. या संपूर्ण संघर्षामध्ये सेंगिनी सोबत, तिची लहान मुलगी सावलीसारखी चालत असते. ती प्रत्येक घटनेची चालतीबोलती साक्षीदार असते. जे उद्याचे भविष्य असते. निकालानंतर ती वकील चंद्रूचे आभार मानते. चंद्रू तिच्या मुलीची जबाबदारी घेतो. त्यावेळी ती मुलगी चंद्रूच्या खुर्चीत बसते आणि कायद्याचे पुस्तक हातात घेऊन, त्यात डोकावू लागते. शिक्षण हेच उद्याच्या पिढीच्या उज्वल आशादायी आणि सकारात्मक जीवनाचं साधन आहे, हा विचार घेऊन, श्रोते मंत्रमुग्ध होऊन चित्रपटगृहाबाहेर पडतात. स्वतःशी प्रामाणिक राहून, सत्याची कास धरली. लोभाला बळी पडलो नाही आणि बाबासाहेबांनी दिलेल्या राज्यघटनेप्रमाणे आपण वागत राहिलो, तर त्या घटनेतील प्रत्येक कलम, हे आपलं संरक्षण करण्यासाठी आयुध म्हणून कामी येऊ शकतं, हा विश्वास चित्रपट प्रत्येकाच्या मनामनात पेरतो. ते जिवंत ठेवण्याचं काम, चित्रपटगृहाबाहेर पडलेल्या प्रत्येक दर्शकाच्या हातात आहे. हा संपूर्ण चित्रपट बघणं म्हणजे एक दिव्यच आहे. संवेदनशील मनाच्या माणसाला हे बघणं हेच मुळात कठीण वाटतं. त्याला स्वतःला, आपणच या घटनेसाठी गुन्हेगार आहोत असं वाटायला लागतं, कारण एक नागरीक म्हणून समाजात होणाऱ्या बऱ्यावाईट घटनेला आपणच जबाबदार आहोत हीच बोच त्याला अस्वस्थ करते. हे खऱ्या चित्रपटाचं काम आहे. कलाकृतीचं काम आहे. समाजाचं वास्तव टिपणं आणि ते समाजासमोर मांडणं याला प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. ते काम जयभीमच्या संपूर्ण टिमने प्रभावीपणे केले आहे. खरं म्हणजे हे एक धाडसच आहे. ते निर्मात्री ज्योतिका यांनी समर्थपणे पेललं आहे. संपूर्ण टिम अभिनंदनास पात्र आहे. या चित्रपटाने पुढील काळात कलावंत, दिग्दर्शकांकडून अपेक्षा वाढवून ठेवल्या आहेत. एक सजग प्रेक्षकवर्ग निर्माण करण्याचं कामही त्यांनी लिलया केलं आहे. त्या वाटेवर हिंदी मराठी चित्रपटाने चालावे हीच या निमित्ताने अपेक्षा.!

प्रा.बी.एन.चौधरी.
अध्यक्ष,
(१२ जिल्हास्तरीय मराठी साहित्य संमेलन-जामनेर)
देवरुप, नेताजी रोड.
धरणगाव जि. जळगाव.
(९४२३४९२५९३ /९८३४६१४००४)

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त धरणगाव नगरपरिषदेतर्फे वृक्षारोपण व प्लॅस्टिक बंदीबाबत कारवाई !

June 6, 2025
जळगाव

शिवसेनेच्या चार नवीन उपनेत्यांची घोषणा

June 5, 2025
जळगाव

जिभेने चित्र रेखाटणाऱ्या राशीचे विलक्षण कौशल्य; मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अनोखी भेट

June 5, 2025
धरणगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ‘लाडू तुला’ कार्यक्रमाचे ॲड. संजय महाजन मित्र परिवारातर्फे आयोजन

June 3, 2025
धरणगाव

नेत्रशक्ती देताना माणुसकीची दृष्टी जपली – पालकमंत्री गुलाबराव पाटील

June 1, 2025
जळगाव

जैन इरिगेशनच्या आधुनिक कृषी उच्चतंत्रज्ञानाचे योगदान अधोरेखित

May 30, 2025
Next Post

'झुंड'मधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतीकात्मकता !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बापरे ! बँकेतील कर्मचाऱ्याची कारकुनी चूक अन् १.५ कोटी चुकीने झाले ट्रान्सफर

May 14, 2022

झुरखेडा येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेश पवार यांचा मुख्यमंत्र्यांचा दालनात आत्मदहनाचा ईशारा !

January 20, 2023

‘आपली प्रश्नावली पाठवावी’, उत्तरं देते, रश्मी शुक्लांचं मुंबई पोलिसांच्या समन्सला उत्तर

April 28, 2021

सरकार कोसळताच बच्चू कडूंच्या घोटाळ्याची फाईल बंद !

June 30, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group