जळगाव (प्रतिनिधी) – घरखर्चासाठी आई वडिलांकडून पाच लाख रुपये घेऊन आणण्याची मागणी सासरच्या लोकांनी केली. या पैशांची पूर्तता होवु न शकल्याने पतीसह तिघांनी विवाहितेला चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. शिवीगाळ करत मानसिक छळ केला.
४१ वर्षीय तरुणी शिरसोली प्र.न. येथील आहे. २६ एप्रिल २००१ रोजी तिचे पुणे आकुड येथील अन्वर रहिमान शेख याच्याशी विवाह झाला. लग्नानंतर चार ते पाच महिन्यांनी सासरच्या लोकांनी संगनमत करत घरखर्चासाठी माहेरील आई वडिलांकडून पाच लाख रुपये घेऊन आणण्याची मागणी विवाहितेकडे केली. या मागणीसाठी पीडित महिलेला शारीरीक मानसिक त्रास दिला. शिवीगाळ करुन चापटाबुक्क्यांनी मारहाण केली.
२४ मे रोजी संध्याकाळी पीडितेचे सासरचे लोक माहेरी शिरसोली येथे आले. पतीने मुस्लिम धर्माचे रितिप्रमाणे तीन वेळेस तलाक बेकायदेशीरपणे बोलुन निघुन गेले. या प्रकरणी पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार सोमवारी पती अन्वर रहिमान शेख सह सासरा, सासु (सर्व रा. आकुड, पुणे) यांच्या विरोधात स्त्री अत्याचार केल्याचा गुन्हा एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. हवालदार चेतन पाटील हे तपास करीत आहेत.
हरिविठ्ठल नगरात विवाहितेचा छळ
माहेरुन पैसे आणण्याची मागणीतून सासरच्या लोकांनी २६ वर्षीय विवाहितेचा छळ करत चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. २६ जुलै २०२१ ते आजपावेतो वेळोवेळी सासरी कैलासनगर उधना सुरत येथे विवाहितेकडे माहेरुन पैसे आणण्याचा सासरच्या लोकांनी आग्रह धरला. मागणी पूर्ण होत नाही म्हणून पीडितेला चापटाबुक्यांनी मारहाण, शिवीगाळ आणि दमदाटी केली. सध्या हरीविठ्ठलनगर येथे वास्तव्यास असलेल्या पीडितेने या जाचाला कंटाळुन तक्रार दिली. त्यानुसार पती आकाश अभिमन वाल्हेसह सासु, जेठ, नंनद यांच्या विरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात सोमवारी स्त्री अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. हवालदार प्रवीण जगदाळे हे तपास करीत आहेत.
















