मुंबई (वृत्तसंस्था) एकनाथ शिंदे यांनी ३९ आमदारांना घेऊन बंड पुकारले आणि भाजपसोबत सरकार स्थापन केले. पण, आता शिवसेनेत खासदार सुद्धा बंडखोरीच्या तयारीत असल्याची चर्चा रंगली आहे. कारण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या बैठकीला एकूण ६ खासदार गैरहजर राहिले आहेत.
राज्यातील ४८ जागांपैकी शिवसेनेचे एकूण १८ खासदार आहेत. या खासदारांपैकी एकूण १२ खासदार मातोश्रीवर उपस्थित आहेत. तर सहा खासदार अनुपस्थित आहेत. हे खासदार नेमक्या कुठल्या कारणामुळे अनुपस्थित आहेत याची माहिती मिळू शकलेली नाहीये. मात्र, कल्याण-डोंबिवलीचे खासदार श्रीकांत शिंदे यांचे वडील एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत आणि ते सुद्धा या बंडात सहभागी झाले आहेत. तर शिवसेनेच्या यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळी यांना पक्षाने प्रतोद पदावरून काढल्याने ते सुद्धा शिंदे गटात सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. या बैठकीला शिवसेनेचे १२ खासदार हजर झाले आहे. शिवसेनेचे खासदार उशिराने गैरहजर झाल्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते. पण आता शिवसेनेच्या एकूण १९ लोकसभा खासदारांपैकी १३ खासदार बैठकीला उपस्थित तर ६ खासदार अनुपस्थित होते.
बैठकीला उपस्थित खासदार
१.गजानन कीर्तिकर,२.अरविंद सावंत,३.विनायक राऊत,४.हेमंत गोडसे,५.धैर्यशील माने,६. प्रताप जाधव,७. सदाशिव लोखंडे,८. राहुल शेवाळे,९. श्रीरंग बारणे,१०. राजन विचारे,११) ओमराजे निंबाळकर,१२) राजेंद्र गावीत
बैठकीला अनुपस्थित खासदार
१.यवतमाळ-वाशिम – भावना गवळी ,२) परभणी – संजय जाधव,३) कोल्हापूर – संजय मंडलिक,४) हिंगोली – हेमंत पाटील,५) कल्याण-डोंबिवली – श्रीकांत शिंदे,६) रामटेक – कृपाल तुमाने,७) दादरा-नगर हवेली – कलाबेन डेलकर,
राज्य सभेतील उपस्थित खासदार
संजय राऊत, प्रियांका चतुर्वेदी