जळगाव (प्रतिनिधी) आता ईडी काय एलसीबीसारखी झाली आहे. रोज मरे त्याला कोण रडे अशी परिस्थीती झाली आहे, अशी खोचक प्रतिक्रिया पाणीपुरवठा स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी दिली.
जोपर्यंत चालवायचे, तोपर्यंत चालू द्या
अल्पसंख्यांक मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना ईडीने अटक झाल्यानंतर मुंबई महानगरपालिकतील स्थायी समितीचे अध्यक्ष शिवसेनेचे यशवंत जाधव यांच्याकडे आयकर विभागाने छापेमारी केली. यावर प्रतिक्रिया देताना पालकमंत्री गुलाबराव पाटील बोलत होते. गुलाबराव पाटील म्हणाले, की एलसीबी सारखी आता ईडी झाली असून, रोज मरे त्याला कोण रडे अशी परिस्थिती या ईडीने केली आहे. जोपर्यंत चालवायचे, तोपर्यंत चालू द्या, असे गुलाबराव पाटील म्हणाले.