धरणगाव (प्रतिनिधी) चोपडा रोडवर आज मोटार सायकलला बॅन्जो गाडीने धडक दिल्याने देवबा आंनदा माळी यांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांच्या पत्नी ज्योती माळी या गंभीर जखमी झाल्या. याप्रकरणी मयताच्या भावाने धरणगाव पोलिसात बॅन्जो चालक शालिक देविदास कोळी (वय ३६) यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबत सुभाष आनंदा माळी (रा शिरपूर) यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हंटले आहे की, २३ जानेवारी रोजी ०३.४५ वा चे सुमारस माझे काका नामे दशरथ फुलचंद माळी यांनी माझे घरी येवुन सांगीतले की, माझा मोठा भाऊ नामे देवबा आंनदा माळी व वहिणी नामे ज्योती माळी यांचा धरणगाव चोपड़ा रोडवर, रोटवद गावापुढे अपघात झाला आहे व सदर अपघातात माझा मोठा भाउ नामे देवबा माळी मयत झाले. म्हणुन मी, माझे सोबत काका नामे दशरथ माळी, कैलास पंडीत महाजन, खेमचंद दशरथ महाजन, प्रविण गिरधर माळी, प्रकाश सुकलाल माळी, मनोज देवबा माळी असे धरणगाव ग्रामीण रुग्णालय येथे आलो. त्यावेळी माझी वहिणी नामे ज्योती देवबा माळी यांचे हातास व कमरेस मुक्का मार लागला होता. त्यांनी मला सांगीतले की, आज दि. २३ जानेवारी २०२२ रोजी दुपारी ०१.०० वा चे सुमरास लग्न लागुन आम्ही हिरो पॅशन प्रोमो सा क्र एम. एच. १८ बीक्यु ७८४१ ने शिरपुर ला घरी जाण्याकरीता निघाले. त्यानंतर दुपारी ०३.४५ वा चे सुमारास रोटवद गावापुढे, चोपडा रस्त्यास मागुन एक बॅन्जोची गाडीने त्याचे मोटर सायकलला मागुन धडक दिली व त्यामध्ये भाऊ देवबा आंनदा माळी व वहिणी खाली पडल्या. सदर अपघातात माझे भावास डोक्यास पायास मार लागुन दुखापत झाली व माझे भावास ग्रामीण रुग्णालय, धरणगाव येथे उपचारकरीता आणले असता दाखल पुर्व मयत घोषीत केले. त्यानंतर मी पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्याकरीता आलो असता सदर बॅन्जो टॅम्पो गाडी वरिल चालक हा पोलीस स्टेशन येथे स्वत हुन हजर झाल्याने तो चालवत असलेली बॅन्जोची गाडी हि टाटा कंपनीचा टॅम्पो क्र एमएच ४३ एडी ०१७५ असा असुन सदर बॅन्जो गाडीवरील चालकाचे नाव शालिक देविदास कोळी (वय ३६ वर्ष, रा. हिंगोणे पोस्ट. जळोद ता. अमळनेर जि. जळगाव) असल्याचे समजले. याप्रकरणी धरणगाव पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.