नवी दिल्ली (वृत्तसंस्था) महागाई, पेगाससह विविध मुद्द्यांवर चर्चा करण्याच्या मागणीसाठी लोकसभेसह राज्यसभेतही विरोधी पक्षांनी गदारोळ केला. त्यामुळे लोकसभेनंतर राज्यसभेचं कामकाजही तहकूब करण्यात आले आहे.
संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. अधिवेशन २९ नोव्हेंबर ते २३ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. सत्ताधारी भाजपने लोकसभा आणि राज्यसभेतील सर्व खासदारा्ंना व्हीप बजावला आहे. तर विरोधी पक्ष काँग्रेसनेही खासदारांना व्हीप बजावला आहे. विरोधकांनी महागाई, पेगाससह विविध मुद्द्यांवर केंद्र सरकारला घेरण्याची रणनीती आखली आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वा पक्षाच्या खासदारांचे संसद परिसरता आंदोलन, सरकारविरोधात घोषणाबाजी केली. त्यामुळे लोकसभेचं कामकाज सुरू होताच विरोधकांच्या गदारोळमुळे कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.
राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी विरोधी पक्षांची बैठक बोलावली होती. परंतू तृणमूल काँग्रेस बैठकीपासून दूर राहिली. दरम्यान, तत्पूर्वी काँग्रेस खासदार मनीष तिवारी यांचा लोकसभेत स्थगन प्रस्ताव, शेतकरी आंदोलनात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना मदत देण्याची मागणी केली. भाकपचे खासदार बिनॉय विश्वम यांची एमएसपीला कायदेशीर हमी देण्याच्या मुद्द्यावर राज्यसभेत चर्चेची मागणी केली.
केंद्र सरकार या अधिवेशनात क्रिप्टोकरन्सी विधेयक मांडणार. तीन कृषी कायदे रद्द करण्यासाठी केंद्र सरकार आज संसदेत विधेयक मांडणार आहे. तर शेतकरी संघटनांनी एमएसपीवर हमी देणारा कायदा करण्याची मागणी केली आहे. संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होणार, सरकारच्या अजेंड्यावर २६ विधेयकं आहेत.