TheClearNews.Com
Wednesday, June 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

निकालावर प्रशांत किशोर यांचं मोठं विधान ; म्हणाले, खरी लढाई २०२४ मध्ये लढली जाईल !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 11, 2022
in राजकीय, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकींपैकी चार राज्यांमध्ये भाजपच्या दणदणीत विजयानंतर पहिल्यांदाच निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांचे विधान समोर आले आहे. चार राज्यांत विजय मिळवल्यानंतर भाजप विरोधकांवर मानसिक दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. किशोर यांच्या म्हणण्यानुसार, दिल्लीतील सत्तेची खरी लढाई २०२४ मध्ये लढली जाईल.

प्रशांत किशोर यांनी ट्विट करुन म्हटलंय की, भारताची लढाई २०२४ सालीच लढली जाईल आणि ठरवली जाईल. कोणत्याही राज्यांच्या निवडणूक निकालावर हे भवितव्य ठरणार नाही. मात्र, साहेबांना हे माहिती आहे. म्हणूनच या राज्यांच्या निकालाभोवती विजयी उन्माद तयार करुन विरोधकांवर मानसिक विजय प्रस्थापित करण्याचा हा एक चतुर प्रयत्न आहे. मात्र, या चुकीच्या फसवणुकीला बळी पडून नका तसेच याचा भागही होऊ नका!

READ ALSO

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

प्रशांत किशोर यांच्या सल्ल्याने लोकसभेसाठी तिसरी आघाडी बनवली जात असल्याच्या चर्चांना मध्यंतरी उधाण आलं होतं. तसेच भाजपविरोधात राष्ट्रीय पातळीवर एक मोठी आघाडी बनवण्यासाठी प्रशांत किशोर प्रयत्न करत असल्याच्याही बातम्या अधूनमधून येत असतात. मात्र, २०२४ च्या निवडणुकीपूर्वी असणाऱ्या राज्यांच्या विधानसभेच्या निवडणूकाही तितक्याच महत्त्वाच्या आणि निर्णायक ठरतात. त्यामुळेच, या राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपविरोधात दंड थोपटून उभे असलेले पक्ष जीवाचे रान करताना दिसत असतात. मात्र, तरीही या निकालाचा अर्थ भाजपने २०२४ ची लोकसभा जिंकली असा लावू नका, असा संदेशच प्रशांत किशोर देत असल्याचं दिसून येतंय. ती निवडणूक स्वतंत्र असेल आणि तिचं भवितव्य या पाच राज्यांच्या निकालावर आधारीत ठरणार नाही, असंही ते म्हणाले आहेत.

दरम्यान, पाच राज्यामधील विधानसभा निवडणुकीमध्ये यावेळी भाजपाने दमदार कामगिरी केली आहे. या पाचपैकी चार राज्यांत भाजपाने सत्ता राखताना विजय मिळवला आहे. त्यातही भाजपाने सत्ताविरोधी लाट असताना उत्तर प्रदेशात ज्याप्रकारे विजय मिळवला त्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. अनेक राजकीय जाणकारांच्या मते भाजपाने ज्या पद्धतीमे उत्तर प्रदेशमध्ये विज. मिळवला आहे. त्याचा फायदा भाजपाला २०२४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये होणार आहे.

गेल्या वर्षी झालेल्या बंगाल विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाला पराभूत करण्यामध्ये प्रशांत किशोर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्यानंतर ममता बॅनर्जीच्या पक्षातील काही नेत्यांसोबत त्यांचे मतभेद झाल्याची चर्चा होती. मात्र आता ही नाराजी दूर झाली आहे. तसेच राजकीय सल्लागार म्हणून प्रशांत किशोर यांच्यासोबत करार सुरू ठेवण्याचा निर्णय तृणमूल काँग्रेसने घेतल्याचे वृत्त आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

May 14, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
जळगाव

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप! सभापती सुनिल महाजनांविरुद्ध १३ संचालकांचा अविश्वास प्रस्ताव

April 28, 2026
Next Post

तरुणानं जिवलग मित्राचाच केला गळा आवळून खून ; कारण वाचून तुम्हाला बसेल जबर धक्का !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अजित पवार हीच राष्ट्रवादी मात्र, कोणत्याही लग्नासाठी तिथी आवश्यक ; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे सूचक वक्तव्य !

April 16, 2023

थरार…धरणगावजवळ जळगावच्या बांधकाम ठेकेदाराला भरदिवसा सिनेस्टाईल लुटले !

May 23, 2023

बीएचआर घोटाळा : मानकापे, तोतला आणि सुजित वाणीचा युक्तिवाद पूर्ण ; उद्या सरकारी पक्ष मांडणार बाजू !

July 6, 2021

अग्नितांडव ! गुजरातमध्ये कोविड सेंटरला लागलेल्या भीषण आगीत १६ मृत्युमुखी

May 1, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group