नवी दिल्ली (प्रतिनिधी) – देशवासीयांना इंधन बचतीचे आवाहन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः देखील यासाठी पुढाकार घेतला आहे. मोदींनी आपल्या ताफ्यातील वाहनांची संख्या लक्षणीयरीत्या कमी केली आहे. यानंतर मोदींच्या पावलावर पाऊल टाकत अनेक भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या ताफ्यातील वाहनांच्या संख्येत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. इतकेच नाही तर काही मंत्री व नेत्यांनी बस, मेट्रो यासारख्या सार्वजनिक वाहतुकीचा, तर काहींनी चक्क सायकलचा वापर करत इंधन बचतीचा संदेश दिला. पश्चिम आशियातील संकट आणि वाढत्या इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर मोदींनी देशवासीयांना
इंधनाबाबत काटकसरीचे आवाहन केले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीला जाताना फक्त २ गाड्यांचा वापर केला. सामान्यतः मोदींच्या ताफ्यात १२ ते १५ गाड्या असतात. मात्र बुधवारी त्यांनी फक्त दोन गाड्यांचा वापर केला. यापैकी एका गाडीत मोदी स्वतः होते. तर दुसऱ्या गाडीत सुरक्षा दलाचे कर्मचारी होते. शिवाय आपल्या नियमित ताफ्यातील वाहनांची संख्या त्यांनी लक्षणीयरीत्या कमी करण्यास सांगितले आहे. मात्र विशेष सुरक्षा समूह (एसपीजी) च्या प्रोटोकॉलनुसार आवश्यक सुरक्षा व्यवस्था कायम ठेवण्यात आली आहे. पंतप्रधानांनी शक्य त्या ठिकाणी मंत्री आणि भाजपशासित राज्यांच्या मुखामंत्र्यांनी देखील आपल्या ताफ्यात कपात केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आपला ताफा लक्षणीयरीत्या कमी केला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वतःच्या अणि मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या घेट निम्म्यावर आणण्याचे आदेश दिले आहेत, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी आपला ताफा १३ वरून ८ गाडयांवर आणला आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या ताफ्यात आता ५ गाड्या दिसतील. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी मंत्री, आमदार व इतर लोकप्रतिनिधींना सरकारी वाहनांचा वापर कमी करण्याचे निर्देश दिले आहेत. गाशिवाय बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनीही पंतप्रधानांच्या कृतीचे अनुसरण केले कृतीचे अनुसरण केले आहे. या सर्व मुख्यमंत्र्यांनी जनतेला देखील इंधन बचतीसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे. गुख्यतचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी राज्यात हेलिकॉप्टर आणि विमानाने प्रयास करण्याऐवजी रेल्वे आणि सार्वजनिक परिवहन व्यवस्थेचा वापर करण्याची घोषणा केली आहे. मोदींनी नुकतेच देशवासीयांना इंधनाचा वापर कमी करण्याचे आणि सोने खरेदी टाळण्याचे आवाहन केले होते. त्यांनी सरकारी व खासगी कार्यालयांना ‘वर्क फ्रॉम होम’ लागू करण्याचा आणि शाळांना ऑनलाइन वर्ग घेण्याचा सल्लाही दिला होता. जनतेने या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद दिल्यास राष्ट्रीय साराकर इंधन बचतीला मोठा हातभार लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे















