धरणगाव (प्रतिनिधी) कंडारी येथील आदर्श शेतकरी निंबा सदाशिव पाटील यांनी 15 पुस्तके लिहिले असून (अध्यात्मिक सुबोधन कथा) 16 पुस्तकाचे प्रकाशन जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या आधी प्रकाशित पुस्तके
1) सारीपाठ 2) सारीपाठ जीवनाच्या 3) अमृताचे बोल 4) व्यथा समाजाची 5) एक धागा सुखाचा महाराष्ट्र शासन मान्य पुस्तक सूची क्रमांक 1173 सन 2009 6) उंबरठा 7) अंतरीचे धावे 8) रक्ताश्रू 9) प्रकाशनवार 10) संस्कार कुंभ 11) सुंदर बालिकेचे गर्भातील सुंदर पत्र 12) जीवनधारा 13) संस्कृती आणि संस्कार कथा 14) संस्कृती आणि संस्कार 15) संस्कार मोती.
निंबा सदाशिव पाटील हे अमळनेर तालुक्यातील कंडारी या गावाला राहतात एक शेतकरी आहेत. परंतु त्यांना वाचनाची गोडी आहे त्यांनी या आधी समाज प्रबोधनासाठी समाजावर संस्कार करण्यासाठी धार्मिक असतील सामाजिक असतील असे पुस्तके लिहिले आहे. त्यांच्या या कार्याचे पालकमंत्र्यांनी कौतुक केले.
या प्रसंगी शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख पी एम पाटील, संजय पाटील, सचिन पवार, राजेंद्र महाजन, साखरे येथील संजय पाटील, पप्पू भावे, वासुदेव चौधरी, भानुदास विसावे, धरणगाव तालुक्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते. तुळशीराम जाधव, निंबा पाटील, पत्रकार धर्मराज मोरे, योगेश पी.पाटील, भगीरथ माळी, अविनाश बाविस्कर, विनोद रोकडे, हर्षल चव्हाण, धरणगाव पोलीस निरीक्षक राहुल खताळ, जळगाव सिव्हिल सर्जन किरण पाटील, मुकुंद गोसावी, अक्षय मुथा, नंदु पाटील, राजु चौधरी अनेक मान्यवर उपस्थित होते.